पान:गांव-गाडा.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २३७

कांहीं जन्मसिद्ध नाही. जातधंद्यांची जातींत कोंडी होऊन त्यांतली कूस इतरांना न कळल्यामुळे 'हातचं सोडून पळत्याच्या मागें' जाण्याचे नादास इतर जाती लागत नसाव्या. पण ह्या आंधळे गारुडाचा परिणाम असा झाला की, धंद्यांना ऊर्जित दशेस नेण्यासाठी नव्या जोमाची माणसे मिळाली नाहीत, आणि ते सांचलेल्या डबकाप्रमाणे नासून व आटून गेले. सर्व जाती परजातींच्या धंद्यांस अंतरल्या, आणि कर्तुकीच्या माणसांना हातपाय हलवायाला व पसरावयाला जागा राहिली नाही, व मिळेल तें जातधंद्यांत मिळवून ओली कोरडी भाकर खाऊन हरि हरि म्हणत बसावे लागते. आणि कोणत्याही धंद्यांत माणसें जास्त

-----
[ मागील पानावरून.]

आलां तर दुष्काळी कानूप्रमाणे सर्वांना काम मिळेल, आणि लहान मुलें थकली भागली माणसें, दुखणाईत व बाळंतिणी यांना फुकट भाकरी व औषधपाणीही मिळेल. त्यांच्याजवळची सावटी तिसऱ्या दिवशी संपली, आणि तो दिवस कसाबसा काढून चवथ्या दिवशी ते कामावर आले. हे लोक केस वाढवितात. त्यामुळे डोक्यावर घमेल्यांतून ओझें न नेतां पहिल्यापहिल्याने घोंगड्यांत बांधून पाठीवर नेत. लवकरच त्यांना कामाचा सराव होऊन सर्वांनी सप्टेंबरपर्यंत आनंदाने काम केले. त्या वेळेचे नगरचे कलेक्टर नामदार मि.जे.पी.ऑर ह्यांच्या प्रगमनशील व सहानुभूतिपूर्ण कारकीर्दीकडे ह्या प्रयोगाचे श्रेय प्रामुख्याने आहे. १९०७ साली तिरमल्यांच्या एका टोळीला गांवकऱ्यांनि अशी अट घातली की, निमी माणसें जर गांवचा निवडुंग काढतील तर बाकीच्यांना खळीं मागूं देऊं. याप्रमाणे त्यांनी तीन दिवस चांगला निवडुंग काढला, व गांवावर निवडंगपट्टी बसली होती, तिचा अंक कमी करावा लागला. ह्याचा दुसरा इष्ट परिणाम असा झाला की, भिकाऱ्यांच्या मागे झेंगट लागते, अशी आवई ऐकून आसपास भिकार येणे काही दिवस बंद पडले. एका मामलेदारांनी भिल्लांचे खावटीसाठी वर्गणीने धान्य जमा करून त्यांना पडीत नंबर लावणीस देवविले व पहिले साली इर्जिक घातली. त्यामुळ शेतचोऱ्या कमी होऊन कुणब्यांचा इतका फायदा झाला की, ते दुसऱ्या सालीही वर्गणी घेऊन भिल्लांच्या बंदोबस्ताचा तगादा करूं लागले.