पान:गांव-गाडा.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      १०७


म्हणजे ८०० वस्तीच्या गांव-महारांना दरसाल सुमारे ८५० रुपयांचे चौदा खंडी धान्य देण्याला गांव कबूल असतांही महार नाखूष. ह्या रकमेत सणावाराची वाढणी,ओंवाळणी, दानें,शेतांतलें गवत, सरपण, जनावरांची माती, कातडे वगैरे मिळविलें तर महारांची दोन ते तीन रुपये डोईपट्टी गांवावर बसते, असें भीत भीत म्हणावे लागते; ह्याखेरीज चोरी चपाटी. दोन वागत्या पाटलांचा असा स्पष्ट अभिप्राय आहे की, जितका गांवचा वसूल तितक्या किंमतीचा हरजिनसी माल महार जागले उकळतात. चार आणे रोज देऊन सुद्धा ते शेतमजुरीला का मिळत नाहीत ह्याचा उलगडा हा अभिप्राय प्रमाण मानला म्हणजे होतो. सन १९०५ साली महार-जागल्यांच्या वतनासंबंधाने चौकशी चालू होती तेव्हां ते स्वच्छ म्हणत की, आम्हांला माणसी दहा रुपये दरमहा दिला तरी परवडणार, नाहीं. टाकळीभान तालुका नेवासे येथील महारांना पांच वर्ष सस्पिंड केलें; तेव्हां पुनः कामावर रुजू करून घेण्याच्या खटपटीसाठी ते गांवकऱ्यांना हजार रुपये देण्याला तयार झाले असे सांगतात. सन १९१२ साली पारनेर तालुक्यांतील वडनेर बुद्रुक ह्या गांवीं निजामशाहीतील एक महार आला, आणि त्याने एकाचे दोन रुपये चवथ्या दिवशी देण्याचा धंदा सुरू केला. ह्या धंद्यांत सदर गांवच्या महारांनी ६००-७०० रुपये घातले. असो. गांवच्या कामाच्या मानाने महार जागल्यांच्या संख्येत नुसती छाटाछाट करून हा कुणब्याचे मागचा ससेमिरा सुटणार नाही. महार जागल्यांच्या पोटगींत सरकारने जी रयतेशी सांवड किंवा सरकत केली आहे, तीच मुळी पायाशुद्ध नाही. समसमान बलाबल असलं तर खरीखरी पाती. कोणीकडे सर्व शक्तिमान कसरी सरकार आणि कोणीकडे रानांत गांठलेला गैर-हिशेबी लंगोट्या ? सरकारचे काम कसेंही होऊन निघते. तें महार जागल्यांनी केले नाही तर पाटील-कुलकर्णी धाकानें अंगमोड किंवा पदरमोड करून त्याचा बोभाटा होऊ देत नाहीत. हे सामर्थ्य रानगड्याने कोठून आणावें ? राक्षस आणि ढंग ह्यांच्या संगतीप्रमाणे ही सांवड कुणब्याच्या जिवावरचीच आहे. तेव्हां