पान:गांव-गाडा.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६      गांव-गाडा.


बळकट संशय येतो की फळफळावळ, ऊस, शेंगा वगैरे उकाळ्यांतील कांही अंश ग्रामप्रभूकडे जात असावा. ह्यांशिवाय ह्या सर्व लोकांची जनावरें बाजारावर मोकार सोडलेली असतात, व ती बेधडक चारा-दाण्यांत तोंडे पालतात. कनिष्ठ स्थितीतले शेतकरी आपला माल खेड्याच्या बाजारांत आणतात, म्हणून वरील शोचनीय स्थिति बंद करण्यासाठी तांतडीचे उपाय योजिले पाहिजेत. बाजारकऱ्यांना काय आणि एकंदर जनतेला काय, कायदेशीर दाद मागण्याचे किंवा आत्मसंरक्षणाचे अवसान नसते, हे जसे कुणब्या-वाण्यांच्या भांडणांत दिवाणी कोर्टात नजरेस येते तसें फौजदारी कोर्टातही येते.

 महार जागल्यांना किती किफायत आहे ह्याची अटकळ येण्यासाठी एक दोन गोष्टी सांगतो. लाखे फळ तालुका शेवगांव जिल्हा अहमदनगर येथे महारांचा आणि गांवाचा लढा पडला. गांवची घरे १२५, लोकवस्ती सुमारे ८००, आणि महारांची लोकसंख्या सुमारे २०० असून काळीत सुमारे १०० नांगर चालत होते. लोक महारांना नांगरामागें चार पायल्या धान्य व रोजची भाकर देण्याला कबूल होते. महारांचे म्हणणे असे पडले की, गांवाला आठ महार लागतात तर आम्हांला रोज दर घरची एक भाकर, सणावाराला सर्व महारवाड्याला वाढणे, पड्याची माती व कातडे, आणि शेतांत पिकेल त्याचा दहावा हिस्सा बलुतें याप्रमाणे मिळाले पाहिजे. शेरांत चार भाकरी होतात व एक वेळच लोक भाकरी घालतात, असें मानिले तर महारांना सवाशें घरांच्या रोजच्या आठ पायल्या म्हणजे सालाच्या बारा खंडींच्या भाकरी होतात; आणि नांगरामागें चार पायल्यांप्रमाणे सालाचे पावणे दोन खंडी धान्य होतेः

-----
(मागील पृष्ठावरून समाप्त.)

आणा व कांहीं एक आणा या दरांनी गेले. त्यांतले उत्तम चार ऊंस महारांनी, दोन जागल्यांनी, व एक नाईकवाडीने शेव म्हणून नेला. नाईकवाडीला कुणबी फुकट ऊंस देईना. तेव्हां त्यानं त्याच्या मुसकाडीत मारली. त्याच महिन्यांत ढवळपुरीच्या मारवाड्याने ऊस आणिले व त्यालाही वरीलप्रमाणे चट्टा बसला