कीं, देवांना मनुष्यकन्या पतकरे पण राक्षसकन्या पतकरत नसे. राक्ष- सांशीं एकरक्त होण्यास देव तयार नव्हते. मनुष्यगणाचा वर आणि राक्ष- सगणाची वधू अथवा राक्षसगणी वर आणि मनुष्यगणी वधू यांना वधूवरांच्या घटितांत शून्य गुण आहे. यावरून मनुष्य आणि राक्षस यांचा कोणत्याहि प्रकाराने विवाहसंबंध होऊं नये असा हेतु असावा असें उघड दिसतें. राक्षसगणाच्या मुलाला देवगणाची मुलगी केली तरीहि गुण १ च, याचा अर्थ असा दिसतो कीं देवांनी राक्षसांवरोवर संबंध करण्यास थोडथोडी सुरुवात केली होती, पण मनुष्यांनी तसें कर- याचें नाकारलें.
देव, मनुष्य आणि राक्षस असे तीन समाज पूर्वी होते. हे तीन निर- निराळे मानववंश असावे. हा सिद्धांत जर खरा ठरला तर जुन्या पुष्कळ गोष्टींचा उलगडा चांगल्या रीतीने करतां येण्यासारखा आहे. राक्षस हा निराळा लोकसमूह होता ही गोष्ट पुष्कळांना पटेल; पण देव आणि मनुष्य या नांवाचे दोन समाज होते याला पुष्कळांकडून लवकर मान्यता मिळणार नाहीं. ह्मणून तत्संबंधी प्रमाणें देणें आवश्यक आहे.
( काठकसंहिता ८
( अथर्ववेद ७
(अ. वेद ४२८५)