पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत.
 (१) औद्योगिकीकरण म्हणजे प्रगती आणि औद्योगिकीकरण जास्तीत जास्त वेगाने घडवून आणले पाहिजे.
 (२) औद्योगिकीकरण झपाट्याने घडवून आणण्यासाठी शासन आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्यावर प्रमुख जबाबदारी राहील.
 औद्योगिकीकरण म्हणजे प्रगती असे मानण्यात नेहरूविचारावरील पाश्चिमात्य पगडा स्पष्ट होतो. पश्चिमी विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैभव यांनी नेहरू इतके भारून गेले होते की, असेच उद्योगधंदे हिंदुस्थानात उभे झाले म्हणजे प्रगती अशी त्यांनी कल्पना झाली. पाश्चिमात्य देशात उद्योजकांचा एक प्रचंड समाज आहे. तो भारतात उपलब्ध नाही. मग उद्योजकाची भूमिका शासनास पार पाडावी लागेल. नेहरुंच्या समाजवादाचे खरे सूत्र एवढेच होते.
 औद्योगिकीकरण म्हणजे प्रगती नव्हे, औद्योगिकीकरण हे प्रगतीचे एक लक्षण आहे. प्रगती विविध शैलींची असू शकते. स्वित्झर्लंड हे जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट- आहे. त्या देशावर पाश्चिमात्य देशांचा मोठा प्रभाव आहे पण तरीही त्यांची एक वेगळी जीवनशैली आहे. विकासाचा काही एक बांधीव ठेका नाही, की एका ठिकाणी अमूक मार्गाने विकास झाला म्हणजे तोच मार्ग अवलंबला की दुसरीकडे आपोआप विकास सिद्ध होईल अशी काही प्रक्रिया नाही. विकास घडवून आणणे म्हणजे शाडूच्या मूर्ती तयार करणे नाही. विकास ही मोठी जिवंत प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक समाजात इतिहासभूगोलाप्रमाणे विकास नवा मार्ग घेतो. गांधींचे अर्थशास्त्र मागासलेपणाचे नव्हते. गांधीजींच्या काळात आणि त्या नंतरच्याही ५०-१०० वर्षात समग्र देशाला अधिकाधिक वेगाने संकलित विकासाकडे घेऊन जाण्याचा तो शास्त्रशुद्ध आराखडा होता. औद्योगिकीकरण म्हणजे प्रगती नाही. समग्र समाजाच्या आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्यकक्षा रुंदावण्याची प्रक्रिया म्हणजे विकास. औद्योगिकीकरण म्हणजे स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्याचे प्रमुख साधन आहे हे खरे, पण साध्य नव्हे.

 गांधीजींच्या सतत सान्निध्यात असलेल्या नेहरूना हे समजण्यात अडचण का यावी? कारण नेहरू आणि ते प्रतिनिधीत्व करत असलेला समाज औद्योगिकीकरणाकरिता उतावळा झाला होता. गोरे गेल्यानंतर त्याची

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने