३
रूठेविला होता. जागजागीं धर्मशाळा, तलाव, वि-
हिरी बांधिल्या होत्या. पाट, कालवे काढून आणवून
शेतकी कामास पाण्याचा पुरवठा केला होता. चोहों-
कडेस नवीन सडकांचे मार्ग काढून त्याचे दोहों बाजूस
समांतराने सघन वृक्षांची गर्द छाया करविली होती.
पुरातन देवळें मशीदी वगैरेंचा जीर्णोद्धार व नवीन
मोठमोठ्या हवेल्या, मजेदार जाणि हवाशीर मंदिरें,
कशीदार, सुंदर आणि भव्य देवळे, मनोरे व बगीचे
ही तयार करवून त्यांचा नेहमीं व्यवस्थितपणा ठेविला
होता. पर्जन्यकाळांत उतार होऊं न देणाऱ्या नद्यादि-
कांस मोठाले पूल बांधिले होते. सरहद्दीवरील गां-
वास तट घातले होते. अनाथ लोकप्रतिपाळक
गृहें जागजागी बांधिली होतीं. तसेंच पूर्वापार चालत
. आलेल्या जाहागिरी, इनाम, देवस्थानें, अग्निहोत्री,
आणि विद्वान, ह्यांच्या नेमणुका निर्वेधपणे चालू ठे-
वून त्या नियमीत रकमा ज्यांच्या त्यांस प्रयास न प-
डतां प्रतिवर्षी मिळविण्याची व्यवस्था राखिली होती.
परराज्यांतून आलेल्या विद्वानांची योग्यतेनुरूप संभा-
वना होण्याकरितां आपल्या पदरीं वेदांती, मीमांसक,
धर्मशास्त्री, जोतिषी आणि नय्यायिक आदीकरून स्व.
. विद्यानिष्णात असे विद्वान वेतनें देऊन ठेविले होते.
आणि तें विद्वन्मंडल दरबारांत नित्यशाहा येत अस-
ल्यामुळे प्रेक्षकांस तो भोजराजाप्रमाणे दिसत असे!
तसेच गवई, सुंदर गायनकलाप्रवीण वेश्या आणि
हरिदास व नाना तऱ्हेचे कारागीर, शिल्पशास्त्रज्ञ लो-
क. त्याचे आश्रयास सदैव असत. क्षेत्रादिकांच्याठाय