पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 बाई मोठी जिद्दीची   १३

 नाव- द्वरकाबाई निवृत्ती वालगुडे

 राहणार - वेल्हे, ता. वेल्हे, जि. पुणे.

 शिक्षण - अजिबात नाही. फक्त सहीकरता येते

 अपत्य - ४ मुली

 आर्थिक स्थिती - सुरुवातीला अतिशय हालाखीची

 व्यवसाय - खानावळ

 माहेरी चांगली शेती. राबणारे भाऊ आणि खातं-पितं घर अशा पार्श्वभूमीवर द्वारकाबाईंचं निवृत्ती वालगुडे यांच्याशी लग्न झालं. सासरची आर्थिक परिस्थितीही चांगली. नवरा राहायला पुण्याला. रिक्षाचा धंदा. सारं नेटकं चालू होतं. पण दारूनं घात केला. होत्याचं अगदी नव्हतं झालं. चार मुलींसकट घरातून बाहेर पडावं लागलं. माहेरी छप्पर मिळालं पण पोटाचं काय? पदरी चार लहान मुली.

 अशा कसोटीच्या वेळेला द्वारकाबाई खचल्या नाहीत. घर सावरायचंच या जिद्दीनी कामाला भिडल्या. स्वत: शेतात मजुरी करायला लागल्या. पण घर मानानं उभं करायचं, ताठ मानेनं जगायचं तर याहून वेगळं काही करायला हवं. द्वारकाताईंनी धाडस केलं. बचत गटामुळे नेमानं घराबाहेर पडणं व्हायला लागलं. गटाच्या बळावर वेल्ह्यात उद्योग उभा करण्याचं त्यांनी ठरवलं. ९८ साली मे महिन्यात १५० शिक्षकांचा प्रशिक्षण वर्ग होता. त्यांना जेवू-खाऊ घालण्याचं कंत्राट यांनी गटाच्या जिवावर घेतलं. त्यासाठी साहेबांना भेटणं, त्यांच्याशी तपशील ठरवणं हे सगळं त्यांनी स्वत: पुढाकारानं केलं.

 अर्थात कामाची तयारी असली तरी भांडवल हवं होतं. आगाऊ रक्कम मिळणार नव्हती. मग द्वारकाताईंना ज्ञान प्रबोधिनीतून तात्पुरते पैसे मिळण्याची सोय झाली. ताईच्या मदतीने सगळी खरेदी पुण्यातून केली. मुली आणि इतर काही बायकांच्या मदतीनं १५० माणसांचा नाष्टा, जेवण, चहा सगळं केलं आणि त्या श्रमाचा मोबदला फायद्याच्या रूपानं दिसला. वर्षभर मोलमजुरी करून मिळणारी रक्कम १० दिवसांच्या उद्योगात मिळाली. त्यामुळे उद्योग केला तर पैसा मिळतो हा विश्वास वाढला.

 उद्योग यशस्वी झाला. घरी बरकत आली आणि नवराही परत आला. त्यानं दारू सोडली. या अनुभवाच्या शिदोरीकर नवरा-बायको दोघांनी मिळून पुढचा व्यवसाय चालू केला. चापेटच्या धरणावर खानावळ चालू केली. मग त्यात नवऱ्यालाही बरोबर घेतलं. रोज ३० माणसांचे जेवण, चहा, खाणं याला सुरुवात झाली. उद्योगातून

इच्छेतूनच कृतीचा उदय होतो.    २८