पान:केकावलि.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत तरी जन यथामति स्तवुनि जाहले सैन्मती; स्तवार्थ तुझिया तुझ्या सम कवी कधीं जन्मती ? ॥ २७ गाई, वासरे, गोपाळ चोरून एक वर्षभर सत्यलोकी नेऊन ठेविली. वर्षसमाप्तीनंतर फिरून येऊन पाहातो तो गाई, वत्स, गोपाळ हे सर्व जसेच्या तसेच असून कृष्ण त्यांच्या बरोबर क्रीडा करीत आहे. असे झाले तेव्हां कृष्णानेच सर्वांचे देह धारण करून सर्व व्यवस्था जेथल्या तेथे ठेविली, अशी ब्रह्मदेवाची खात्री होऊन तो कृष्णाला शरण गेला व त्याने नेलेल्या सर्व गाई, वत्स, गोपाळ यांस फिरून आणून पोंचविलें. [मोरोपंत-कृष्णविजय-पूर्वार्ध-अ० १२-१४ पृ० ३५-३९.] कृष्णाला शरण जातांनाच 'अतयं महिमा तुझा' म्हणून ब्रह्मदेवानें स्तुति केली. श्रीमद्भागवतांत दशमस्कंधाच्या १४ व्या अध्यायांत ब्रह्मस्तुति [वामनपंडितकृत कवितासंग्रह-भाग १-पृ० ३२८-४०४] नांवाचे एक प्रकरण आहे. त्यावर वामनानें श्लोकात्मक टीका केली आहे. यांतील पुढील लोकार्य या संबंधाने वाचण्याजोगे आहेत:-देवाचा महिमा अतयं आहे. (१) 'जो या देवपणी अतयं महिमा जो तर्कवेना कधीं, तेव्हां वर्णवितो ) अतींद्रिय कसा? बोलेल ऐसें विधी'. ॥ पृ० ३३६,९. 'अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोऽपि । नेशे महि त्ववसितुं मनसांतरेण साक्षात्तवैव किमुतात्मसुखानुभूतेः ॥' [श्रीमद्भागवत-दशमस्कंध-अध्याय १४ श्लोक २]. प्रभूचे गुण अनंत आहेत:-(ब्रह्मदेव म्हणतो)-(२) तूं जो असा त्या तुझिया गुणांला, मोजावया नीलसरोजनीला । होती जगी सक्त असें न कोणी, अनंत तूझे गुण चक्रपाणी!' ॥ १४६ ॥ (३) 'काळेंकरूनि धरणीरज मोजणारे, होतील मोजितिलही हिमबिंदु सारे । होती समर्थ गणना किरणी कराया, तूझे न मोजविति सद्गुण देवराया !' ॥ १४७ ॥ ‘गुणात्मनस्तेऽपि गुणान्विमातुं हितावतीर्णस्य क ईशिरेऽस्य । कालेन यैर्वा विमिताः सुकल्पैर्भूपांसवः खे मिहिका धुभासः ॥ ७ ॥ [श्रीमद्भागवत-स्कंध १० अ० १४]. Compare:- Canst thou by searching find out God? Canst thou find out the Almighty unto perfection ? Job. XI. 7. Also Ps XL6.)"श्रुतिशब्दाविषयी पुढील विवेचन मनन करण्याजोगे आहे. जिच्या योगानें धर्म ऐकू येतो ( समजतो.) ती श्रुति, असा श्रुति शब्दाचा मूलार्थ आहे. वेदमंत्र म्हणण्याच्या वेळेस पाठकाचे चित्क्षाची एकाग्रता राहून अर्थानुसंधान राहावे म्हणून पुस्तकावरून पठण करण्याचा निषेध शास्त्रकारांनी केला आहे. ऐकून म्हणणे यावरून वेदास श्रुति हें नांव पडले." (व्युत्पत्तिप्रदीप). ६. बुद्धि. १. साधुजन, सजन, कविजन. २. आपल्या बुद्धीप्रमाणे, यथाबुद्धि. ३. चांगल्या बुद्धीचे. येथे कवीने भगवत्स्तवनाचें फल सन्मति होणे हे दर्शविले आहे. भगवंताचे यथार्थ स्तवन करणे केवळ अशक्य समजूनही व्यासवाल्मीकादि कविजन यथाशक्ति १५ परमेश्वराचे स्तवन करून सुबुद्ध झाले. कितीएक साधुजन भगवत्स्तुति करून सन्मति । या बुद्धीचे) अशी आख्या पावले, ईश्वरस्तवाच्या योगाने कित्येक साधुजनांची ) बुद्धीचे होत-अशी लोकांत प्रसिद्धि झाली. त्यांना भगवत्स्तक भगवंताचे यथार्थ स्तवन करून त्यास संतुष्ट करण्यास जरी करितां केला. यावरून भगवंताचे यथार्थ स्तवन करून