पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ४. ह्या सृष्टीत तीन प्रकारचे मनुष्य आहेत. एक मूर्ख, यांस खरें कोणते व खोटें कोणते हे मुळीच समजत नाही. दुसरे, आपले वरिष्ठ जे सांगतील तें सर्वदां खरे असे मानणारे. मग त्यांचा स्वतांचा अनु- भव कसाही असो. तिसरे, वरिष्ठांनी किंवा कोणीही एकादी गोष्ट सांगितली तर ती पडताळून पाहून तिचा खरेपणा सिध्द झाला ह्मणजे ती खरी आहे असे मानणारे:-शेतकरी, कुणबी यांस ग्रह वक्री कसे येतात हे जर सांगू लांगले तर त्यांच्यांत अज्ञान इतके प्रकारांनी भरटेलें असतें की ग्रहांची वक्रगति समजाऊन देण्यास आपण कि- तीही परिश्रम घेतले तरी ते व्यर्थ जाऊन त्यांचे अज्ञान कधीही दूर व्हावयाचे नाही. दुसरें, कितीएक लोकांस चंद्रग्रहण कसे होते हैं जर विचारिलें तर त्यांचे उत्तर ते, " चंद्रास राहू हा राक्षस ग्रा- शितो," असें देतात. आणि राहू हा राक्षस ग्राशितो कशावरून, असे विचारिलें तर त्यास उत्तर हे की, " वाः आमचे पुराणीकबोवा असे सांगतात आणि त्यांचे पोथींतबी तसेंच लिहिले आहे." ति- सरे प्रकारचे लोकांस ग्रहण कसे होते असे विचारिलें तर ते, पृथ्वीची छाया चंद्रावर पडून त्या छायेनें चंद्रबिंबाचा ग्रास होतो, असे सांग- तात, आणि पुढे जी ग्रहणे येणारी त्यांचे स्पर्शमोक्षकाल आपले गणिताने पूर्वी आणून ठेवून त्या गणिताचा खरेपणा प्रत्यक्ष अनुभवास आणून देतात. ५. या तीन प्रकारचे लोकांत पहिले प्रकारचे “ मूर्ख " आणि तिसरे प्रकारचे ज्ञानी असेंच ह्मणावे लागते. आतां पृथ्वी स्थिर आहे किंवा गतिमान् याबद्दल आमचे विचार आह्मी पहिले प्रकारच्या गृहस्थांपुढे ठेवीत नाही, परंतु तिच्या ह्मणजे विचारी पुरुषांपुढे ठेवितों असे समजावे. ६. एक शेर उचलावयास सोपें किंवा दहाशेर उचलावयास सोपें असा जर कोणी प्रश्न केला तर एक शेर उचलावयास सोपें असें को- जाही सांगेल. एक गोटी फिरविणे सोपें किंवा शंभर गोट्या फिरवाव- यास सोपे असा जर प्रश्न केला तर एक गोटी फिरवावयास सोपें