आहे. आंतील कचरा दोन ठिकाणी आहेत. एक वरच्या मज-
ल्यावर आणि दुसरी तळमजल्यावर. येथे जे वेलबुटीचें खोदीव
काम आहे त्यांत कारागिरीची आणि पैसा खर्चण्याची हृद
झाली आहे. ह्या ताजाच्या एका आंगास निमाज पढण्याक-
रितां एक सोपा बांधलेला आहे. त्यांत ६ हात लांब आणि
३ हात रुंद असे एकेक आसन संगमरवरी पांढरा दगड आणि
दुसरा तसाच गुळगुळीत तांबडा दगड ह्याची एकेक महिरप
अशी हजार आसने केली आहेत. ह्यांत यमुनेचा पाठ आणून
जलक्रीडेकरितां एक बावडी बांधली आहे. तिला चार मजले इमारत
वाटोळी बांधलेली आहे. ती फार चमत्कारिक आहे. ह्या
ताजमहालांतील बगीच्याची व्यवस्था सरकाराने इंजनेर खात्यांतू-
न बरीच ठेविली आहे.
येथें त्याच नमुन्याची दुसरी इमारत यमुनेच्या काठी नूर.
जहानच्या दिवाणानें बांधली आहे. तीही पाहण्यासारखी आहे.
आग्र्याच्या किल्यांत मोतीयहजाद वगैरे इमारती आहेत.
त्या सर्व अनुपम्यच आहेत. किल्यांत एका ठिकाणी स्नानाची
जागा केली आहे. तेथें यमुनेच्या पाठाचे पाणी आणून दरएक स्नाना-
च्या जाग्याच्या सभोंवती पाठ फिरविले आहेत. हे सर्व काम संगमरव-
राचें आहे. सारांश माती आणि विटा प्रमाणे संगमरवर येथे
झालेला आहे. आग्रयास रेल्वेचें स्टेशनही विटांचे फार चम
तत्कारिक रीतीचे बांधलेले आहे.
येथील लोक दगडी कोरीव व कलाबतूचें काम फार चांगले
करितात. मला असे वाटते की, प्राण्याने जन्मास येऊन
आपल्या डोळ्याचे सार्थक करणे असल्यास एकवार तरी येथे
येऊन ह्या सर्व इमारती पाहाव्या म्हणजे त्यास जे समाधान
होईल तें अवर्णनीय आहे. येथे सत्रंज्या, हिंदुस्थानचें वगैरे
भरजरी कापड फार चांगले होते.
येथे कोहळा आणि साकर ह्यांचा पाक करून पेठा म्हणून
पान:काशीयात्रा.pdf/३१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
