पान:करुणादेवी.djvu/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स चिं त
शि री ष

♣ * * * * * * ♣








 शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती. दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली. राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला. अधिकारी असावेत तर असे असावेत, असे राजा म्हणाला.

 आदित्यनारायण आता वृद्ध झाले होते. त्यानी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले. एके दिवशी ते राजाकडे गेले व प्रणाम करून म्हणाले, “ महाराज, आता काम होत नाही. नवीन तरुण मंडळीस वाव द्यावा. मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे.”

 “ आदित्यनारायण, तुम्ही पुष्कळ वर्षे सेवा केलीत. तुम्हाला आता विश्रांती हवी. मी तुम्हाला मुक्त करतो. परंतु आम्हाला वेळप्रसंगी पोक्त सल्लामसलत देत जा. तुम्ही अनुभवी थोर माणसे.”

 “ मी केव्हाही सेवेस सिद्धच आहे.”

 “ परंतु तुमची जागा कोणाला द्यावी ? शिरीषांना दिली तर बरे होईल का ?”

 “ महाराज, शिरीष माझे जावई. तेव्हा मी काय सांगू ? परंतु मी खरेच सांगतो, त्यांच्यासारखा कर्तव्यदक्ष मंत्री मिळणार नाही रात्रंदिवस ते प्रजेची चिता वाहातात. दुष्काळात ते एकदाच खात. एकदा. हेमाने घरात काही गोड केले. परंतु ते रागावले. त्यांनी स्पर्श केला नाही. लोक अन्नान्न करून मरत असता मी का गोड खात बसू ? आधी प्रजा पोटभर जेवू दे. मग मी जेवेन,’ असे ते म्हणाले. असा मंत्री कोठे मिळणार ?"

सचिंत शिरीष * ४९