हे पान प्रमाणित केलेले आहे.
“ काळजी नको करू.” लोक म्हणाले.
आईबापांच्या पाया पडून व करुणेचा आणि प्रेमानंदाचा निरोप घेऊन शिरीष निघाला. तो घोड्यावर बसला. गेले घोड़े. शिरीष मागे वळून पाहात होता. गेले घोडे. वाऱ्यासारखे गेले. लोक आपापल्या घरी गेले. सुखदेव व सावित्री घरात आली. करुणा घरात आली. ती रडत होती.
“ करुणे, रडू नकोस.” प्रेमानंद म्हणाला.
“ मी एकंदरीत दुर्दैवीच आहे !” ती म्हणाली.
“ करुणे, अशुभ मनात आणू नये.” तो म्हणाला.
“ परंतु येते त्याला काय करू ?” ती म्हणाली.
“ कर्तव्य करणे एवढे आपले काम.” असे म्हणून प्रेमानंद निघून गेला.
शिरीषचे प्रयाण * १९