पान:कथाली.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इतक्यात एक बिनचेहेऱ्यांचा जमाव दाणदाण पावले टाकत त्या पक्ष्यांवर दगड फेकत पुढे येऊ लागला. काही पक्षी खाली कोसळले. अनेकांचे पंख गळून पडले. काही मेले. पण काही रक्तबंबाळ पक्षी मात्र पुढे पुढेच जात होते आणि अचानक त्या विवरातून एक टवटवीत पिंपळान उगवले. त्यावर सूर्यप्रकाशाची कोवळी किरणे ते क्षितिजापर्यंत पोचलेले पक्षी नाचू लागले होते. सविता ते पिंपळपान घेण्यासाठी पुढे झाली नि. तिला जाग आली.
 बेसिनपाशी जाऊन तिनं चेहऱ्यावर सपासप पाण्याचे फटकारे मारले. पदराने चेहरा पुसत चंद्रकोर नेटकी केली.
 येणाऱ्या जानेवारीत मी पासष्ठी पार करीन. अरुण लवकर गेला म्हणून मीही लवकर जाईन हे कशावरून? माझ्या माहेरी तर सगळे ऐंशीचा पहाड पार करून पुढे गेलेले. इतके जगायचे तर तसं नियोजन हवं. मुनू, महीन, देवा, दिगंत पाहत पाहता मोठे होतील. आपापले अवकाश शोधतील. सवितानं मनाशी काहीतरी ठाम निश्चय केला. अरुणाचलमच्या विवेकानंद केंद्रातल्या जॉर्जुम एत्तेचा फोन नंबर शोधून काढला.
 "रोश, संध्याकाळसाठी घोटेडी खिचडी टाक," असं सांगत सावी मोबाईलची बटणे दाबू लागली.