पान:ओळख (Olakh).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रियता कोल्हटकरांना कधीच नव्हती. आणि पुढे चालन 'प्रेमसंन्यास', 'पुण्य. प्रभाव ' या नाटकांनाही ' सौभद्र', 'मानापमान' आणि 'स्वयंवर' यांची लोकप्रियता मिळाली नाही. याच काळात संशयकल्लोळ' संगीत होऊन आला होता. गडक-यांच्या ज्या नाटकांनी लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण केले ती नाटके म्हणजे 'भावबंधन' व 'एकच प्याला'. ऐतिहासिक सत्य असे आहे की 'एकच प्याला' रंगभूमीवर येण्यापूर्वीच कोल्हटकरांची लोकप्रियता ओसरून दीर्घकाळ झाला होता. 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान' आणि ' स्वयंवर' ही नाटके तुफान लोकप्रिय होती, त्यांनी मराठी रसिकांना वेडे केलेले होते. पण किर्लोस्कर देवल, खाडिलकर यांच्या नाटकांची लोकप्रियता गडकन्यांच्या उदयाला बाधक ठरू शकली नाही. अशा प्रकारे आपण १९२० पर्यंत येतो. या पुढच्या कालखंडात एकीकडे मनोहारी संगीत, विनोद, सुखद नाट्यभास, बालगंधर्व, गणपतराव बोडस, हलके फुलके नाटक, कुशल संवाद आणि दुसरीकडे सदोष असणारे पण वालगंधर्वांनीच उभे केलेले गडकन्यांचे एकच प्याला' हे गंभीर शोकनाट्य; असा सामना चालू होता. भडक सदोष अतिरेकी, विस्कळीत अशा नानाविध दोषांनी व्याप्त असणारा गडकऱ्यांचा एकच प्याला' गंभीर नाटक असूनही व शोकांतिका असूनही सहजपणे लोकप्रिय बनणान्या कुशल नाटयाभासावर मात करून गेला हा इतिहास आहे. वा. लं. ना घटनांचे हे कालानुक्रम मान्य असल्याचे दिसत नाही.
 'भाऊबंदकी' यासारख्या खाडिलकरांच्या अत्यंत यशस्वी नाटकाचे शेवटचे प्रवेश साफ कोसळतात ही गोष्ट सर्वांनीच नोंदवलेली आहे. पण देवलांच्या 'शारदा' नाटकाचीही हकीगत यापेक्षा निराळी नाही. त्याही नाटकाचे शेवटचे प्रवेश साफ कोसळून पडतात. कोसळत नाही 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानपमान', आणि ' स्वयंयर'. या जोडीला गडकन्यांचा एकच प्याला'. गडकन्यांच्या नाटयलेखनात मांडणीत दोष नाहीत असे नाही. उलट ते दोष फार उत्कट आहेत. पण नाटकाचा शेवट कोसळत जाणे ही गोष्ट गडकन्यांच्या नाटकात घडत नाही. ज्या नाटककाराचे पहिले अंक चटकन पकड घेतात आणि नाटयाचा शेवट प्रभावीपणे होतो, शेवट कोसळत नाही, त्या नाटककाराची नाटयाची समज कच्ची, आणि ज्यांचे शेवटाकडे येऊ लागताना कोसळत जाते त्यांची नाटयाची समज उपजत आणि तुलनेने पक्की, ही गोष्ट मान्य करणे फार कठीण आहे.

 मराठी नाटककारांना कादंबरी आणि नाटक यातील फरक कधी सापडलाच नाही. संवादाद्वारे कथानक पुढे सांगत राहाणे ही गोष्ट आणि नाट्याची मांडणी या दोन बाबी स्वतंत्र आहेत हे मराठी नाटककारांना उमज

१२५

ओळख