पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आपलं प्रेम ‘बोलाचाच भात'-दुसरं काय? तिथल्या लोकांनी आपला देश कल्याणकारी (Welfare State)म्हणून जाहीर केलाय. देशातील सा-यांचं कल्याण वाहण्यास तो प्रतिबद्ध कसा आहे याचं एक छोटं उदाहरण सांगतो. पूर्वापार संस्कृती जपण्याच्या ध्यासातून त्यांनी घोडागाडी, ट्राम इ. चालू ठेवल्यात. ऑस्ट्रियात काही काळ बर्फ पडतो, वाहतूक ठप्प होते. व्हिक्टोरिया चालणे कठीण होते. त्या काळात व्हिक्टोरिया चालकाला तेथील सरकार दुहेरी निर्वाहभत्ता देते. एक घोडवानासाठी व दुसरा घोड्यासाठी. अजून आपल्याकडे अशासकीय नोकरी करणाच्या नोकरदार, मजूर, शेतकरी, महिलांना निवृत्तीवेतन नाही. जपानमध्ये तर प्रत्येक नागरिकास दुहेरी निवृत्तीवेतन मिळतं- एक व्यक्तिगत, त्याच्या कष्टाचं फळ म्हणून. दुसरं राष्ट्रीय! राष्ट्र उभारणीतील त्याच्या खच्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून! नि वृद्धावस्थेत रंजन, उपचाराच्या गरजा वाढतात त्या भागविण्यासाठी म्हणून. आपला देश गरीब आहे. संख्या मोठी व साधने सीमित, असा विषम प्रवास करणारा आपला देश. पण आपण याचं कधीच नियोजन, नियंत्रण, नियमन करण्यास नाही का सुरुवात करायची? किती दिवस जाती, धर्म, अल्पसंख्यत्व, दारिद्यरेषेखालीलसारख्या कसोट्यांच्या कुबड्या घेत उलटीच वाट चालत राहायचं?

 युरोपच्या प्रवासात शेवटचा देश पाहायचा म्हणून बेल्जियमला गेलो होतो. ब्रुसेल्स दिवसभर पाहिलं. पहाटेच्या गाडीने ब्रुसेल्सहून कॅले(स) (फ्रान्स) ला जायचा कार्यक्रम होता. भ्रमंती करून मध्यरात्री आम्ही धापा टाकत ब्रुसेल्स रेल्वे स्टेशनवर आलो. पहाटे चार वाजून बारा मिनिटांची गाडी होती. रेल्वे स्टेशनवर आलो तर तेथील कर्मचा-यांचा संप असल्याचे कळले. पण सर्व कर्मचारी ड्यूटीवर होते. वाटाघाटी सुरू होत्या. क्लोज टी.व्ही.वर त्या दिसत होत्या. इकडे गाडीची पूर्वतयारी-शंटिंग, तिकीट देणं, स्वच्छता सारं नित्याप्रमाणे सुरू होतं. गाडी चार बाराऐवजी चार पंधराला सुटली. अवघी तीन डब्यांची गाडी अन् त्यात आम्ही तिघे भारतीय व एक इटलीची महिला प्रवासी- गाडी सुरू होण्यापूर्वी संप मिटला होता. सारे कर्मचारी क्षमागुच्छ (रिग्रेट बुफे) घेऊन आले. तीन मिनिटे उशीर झाला म्हणून तळमळत होते. त्यांच्या युनियननी प्रत्येक प्रवाशाला नुकसानभरपाई म्हणून पन्नास फ्रैंक्स दिले. ज्या देशात वेळ, कर्तव्य याचं इतकं काटेकोर भान असतं, ते देश खरे प्रजासत्ताक होतात. बेल्जियम हा बचतीचा देश मानला जातो. तेथील सरकते जिने जिन्यावर पाय ठेवला की सुरू होतात. जिन्यावर कोणी नसेल तर आपोआप बंद होतात व वीज वाचते. आपल्याकडे देवापुढे तेलाच्या

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५०