बनवला, तो पण वरवरचा. आपण मूळ भारतीयच राहिलोय याच्या कितीतरी पाऊलखुणा मला चोहोबाजूस विखुरलेल्या दिसताहेत...
स्वातंत्र्य व स्वराज्याच्या गेल्या पाच दशकांच्या वाटचालीत आपण काहीच केलं नाही असं नाही. जे केलं त्याचा दृश्य व दृढ परिणाम दिसावा - डोळ्यात भरावं असं घडलं मात्र नाही. आपण जोवर एकदा विदेशी जाऊन येत नाही, तोवर काही गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत. भारत गर्दीचा देश आहे, इथं सर्वत्र घाण आहे, निरक्षरता कमालीची, नागरी भान नगण्य, राष्ट्रीय झेंडा, राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रभाषा याबद्दल कमालीचं अज्ञान व अनास्था, हे सारं का झालं? तर आपणास याचं जुजबी नि परिणामशून्य ज्ञान. म्हणून या देशाची प्रजासत्ताक मशागत होणे आवश्यक वाटते. गेल्या पन्नास वर्षांत आपण स्वदेशी स्वराज्य' नाही निर्माण करू शकलो. येत्या पन्नास वर्षांत तरी आपणास भारत ख-या अर्थाने 'प्रजासत्ताक' बनवता येते का ते तर पाहू...
मी फ्रान्सला गेलो होतो. फ्रान्स नि इंग्लंड यांच्यामध्ये पूर्वी तीस मैलाची खाडी (डोव्हर ते कॅले) होती. आता ते अंतरही राहिले नाही. पॅरीस ते लंडन जोडणारी समुद्राखालून आलेली रेल्वे; तिनं दोन्ही देश एक केले. 'युरोपियन युनियन' आता वास्तव झालंय! साच्या युरोपात एक चलन, एक ओळखपत्र, एक पारपत्र (पासपोर्ट)- सारा खंड एक. पण आपला खण्डप्राय देश मात्र दिवसानुगणिक खंड-खंड होतोय! फ्रेंच माणसाचं त्याच्या भाषेवर विलक्षण प्रेम. इंग्रजी येत असतं पण फ्रेच माणसास आपल्या साहित्य, संस्कृती, कला, संगीत, नृत्य अगदी आपल्या दारूचं (वाइन) पण किती कौतुक असतं! या उलट आपण! इंग्रजी बोलता येणं प्रतिष्ठेचं! विदेशी पोषाखाचा रुबाब! पाश्चात्त्य जीवनपद्धतीचं अतूट अनुकरण! अशांनी देश थोडाच मोठा होतो! आपणास 'मेरा भारत महान' बनवायचा असेल तर राष्ट्रभाषा प्रेम जोपासायला हवं. भारतासारखे बहुभाषी देश कित्येक आहेत. सिंगापूर, स्वित्झर्लंड, रशियासारखे देश घ्या. आपलं बहुभाषिकत्व जपत त्यांनी राष्ट्रभाषा विकसित केली. इस्त्रायलनं तर बोलीस (हिब्रू) राष्ट्रभाषा बनवून विक्रमच केला. म्हणून ते सारे देश खरे प्रजासत्ताक बनले. ज्या देशाला आपली भाषा नसते, त्याला भविष्यही नसतं म्हणतात...
ऑस्ट्रियाला गेलो होतो. तिथलं प्रजासत्ताक पाहून मी अजूनही गारदच आहे... तिथं आपल्याप्रमाणेच पूर्वी राजेशाही होती. जुन्या-पुराण्या ऑस्ट्रियाचा त्यांना किती अभिमान! व्हिएन्नात तिथला राजवाडा, चर्च, व्हिक्टोरिया (घोडागाडी) बद्दल ते तोंडभरून सांगतात नि त्या साध्या गोष्टी मनःपूर्वक जपतात!! नवा राजवाडा, भवानी मंडप, शनिवारवाडा, रायगड या सर्वांवर