जर्मनीकडे स्थलांतरित होत होते. सुमारे दीड लक्ष निर्वासित त्यावेळी मोजले गेले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणावर शीतयुद्धाचे सावट गडद होत निघालेले. विशेषतः २७ नोव्हेंबर, १९५८ ला सोव्हिएत संघराज्याचे प्रमुख निकिता क्रुश्चेव्ह यांनी बर्लिनसंदर्भात दोस्त राष्ट्रांना दिलेल्या निर्वाणीच्या इशा-यामुळे युद्धाची ठिणगी केव्हा पडेल व तिसरे महायुद्ध भडकेल, याचा नेम नव्हता. पश्चिम बर्लिनमधील आपल्या फौजा दोस्त राष्ट्रांनी माघारी घेऊन बर्लिन शहर मुक्त करावे, असं रशियाने धमकावलेलं! त्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिलेली. १९५९ च्या फेब्रुवारीत झालेल्या जर्मन-रशिया शांती कराराच्या पार्श्वभूमीवर १९६१ च्या जूनमध्ये केनेडी-क्रुश्चेव्ह बोलणीही फिसकटली नि जगाचे श्वास रोखले गेले. १५ जून, १९६१ ला पूर्व जर्मन कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख, सेड व प्रिव्ही कौन्सिलचे प्रमुख वॉल्टर उल्बिच यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद घेऊन पूर्व जर्मनी व बर्लिनमध्ये लोकांवर पश्चिम जर्मनी व बर्लिनमधील प्रवेशास बंदी करणाच्या कायद्याचे व भिंत उभारली जात असल्याचे खंडन केले तरी प्रत्यक्षात मात्र १३ ऑगस्ट १९६१ पासूनच बर्लिनच्या सरहद्दीवर रशियन फौजा, पोलीस, सशस्त्र मोटार गाड्या, रणगाडे यांसह दाखल झाले होते व त्यांच्या संरक्षणात काटेरी कुंपण घालण्याचे काम सुरू झाले होते. पूर्व बर्लिनमधील ६०,००० नोकरदार/ कामगार जे पश्चिम बर्लिनमध्ये काम करत, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. तारेच्या कुंपणाची जागा पुढे सिमेंट काँक्रिटच्या भिंतीने घेतली. पूर्व नि पश्चिम जर्मनीच्या १६६ किलोमीटर लांबीच्या सरहद्दीपैकी १०७ किलोमीटर लांब भिंत बांधली गेली. चार मीटर उंचीची ही काँक्रिट भिंत. वरती गोलाकार पाईप्स. पूर्वेच्या बाजूस ‘निर्मनुष्य क्षेत्र' (No Man's Land) जाहीर झालेलं! जो कोणी पूर्व बर्लिनवासी हे निर्जन क्षेत्र ओलांडण्याचा प्रयत्न करील त्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्यापुढे चिलखती गाड्यांची रांग! रणगाडे उभे ठाकलेले! एखादे वाहनही जाऊ नये म्हणून घेण्यात आलेली खबरदारी! त्यानंतर नजरबंद क्षेत्र! टॉवर, बंदूकधारी, प्रशिक्षित कुत्र्यांचे दल, खंदक नि मग त्यापुढे आणखी एक तशीच तटबंदी! इतक्या साध्या पहाच्यातूनही अन्याय, अत्याचाराला कंटाळून पश्चिमेच्या ओढीने पळणा-यांचे १०० बळी या पहाण्याने घेतले. १७ ऑगस्ट, १९६२ ला पीटर फॅचरचा पहिला बळी. ख्रिस ग्रॉफी ६ फेब्रुवारी, १९८९ ला बळी गेला. तो शेवटचा बळी ठरला!
या प्रत्येक बळीगणिक पूर्व जर्मनीतील असंतोषास उठावाचे धुमारे फुटत होते. तिकडे रशियाल मिखाईत गोर्बाचेव्ह चेर्नेन्कोच्या अकाली निधनाने राष्ट्रप्रमुख बनले (१९८५) आणि त्यांच्या 'पेरेस्रोईका'ने ‘ग्लासनोस्त'ने