या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संशय
गोष्टीतील राजा-राणी
भाबडी अन् चिऊ-काऊ
ऐकुनिया झाले मन
असे लोण्याहून मऊ
दर येणारी घटिका
मज वाटताहे बाऊ
काही वेळा अशा आल्या
फुटे आसवांचे प्याऊ
साऱ्या जखमाच ओल्या
कशा उघडुनी दाऊ ?
तशा दाविल्या एकदा
कशी विसरून जाऊ ?
न लावाल मशाल
कसा भरवसा ठेऊ ?
मित्र द्रोहाचीच पुन्हा
कशी परीक्षा मी घेऊ ?
नाही मनुष्य पारख
का आत्मदोष देऊ ?
उष:काल । ३८