पान:इहवादी शासन.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १८५
 


पोथीबद्ध अवस्था

 भारतांतील आरंभापासून अखेरपर्यंतचे मुस्लिम शास्ते, अकबर व झनल अबीदिन हा काश्मीरचा सुलतान असे कांही अपवाद वगळतां, पुराणमतवादी, हट्टाग्रही अशा मुल्ला-मौलवींच्या छायेखालीच होते. मुईनुद्दीन चिस्ती, नुरुद्दीन गझनवी, सरहिंदी, वलीउल्ला, शहा अदब्दुल अजीज या नाममालिकेचा उल्लेख कारणपरत्वें वर आलाच आहे. हे व यांचे अनुयायी व त्यांच्या तंत्राने वागणारे सुलतान यांनी इस्लाम हा कायमचा पोथीबद्ध, कर्मकांडात्मक, परिवर्तनशून्य, अंधश्रद्ध, असा करून ठेवला. त्यामुळे त्याला इहवादी रूप देणें कोणालाहि शक्य झालें नाही. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरांत त्याच्या नेत्यांचा पराभव होऊन इंग्रजांची सर्वंकष सत्ता भारतांत प्रस्थापित होईपर्यंत, भारतांतील मुस्लिम समाज याच पोथीबद्ध अवस्थेत होता. तेथून पुढला शंभर-सव्वाशे वर्षांचा भारतांतील इस्लामचा इतिहास हा सर सय्यद अहंमद यांचा 'अलीगड पंथ' व मौ. महंमद कासीम नानवटवी यांचा 'देवबंद पंथ' यांचा इतिहास आहे.
 विश्व- मुस्लिमवाद, ब्रिटिश राज्यकर्त्यांशी एकनिष्ठा, धर्माची अपरिवर्तनीयता, शरीयत या मुस्लिम कायद्यावरील अंधश्रद्धा या बाबतींत या दोन पंथांत तीव्र मतभेद होते. पण भारतीयांशी एकात्म व्हावयाचें नाही, भारतांत राहूनहि विभक्त वृत्तीच जोपासावयाची, मुस्लिमेतर समाजाशी शत्रुभावच ठेवावयाचा यांविषयी मात्र दोन्ही पंथांचं पूर्ण मतैक्य होतें. यामुळे लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, इहवाद, सर्वधर्मसमानत्व, बुद्धिप्रामाण्य हीं जीं भारतीय नेत्यांनी नवसमाजनिर्मितीसाठी अंगीकारलेलीं तत्त्वें, त्यांना भारतांतील मुस्लिम समाज सतत विरोधच करीत राहिला. येथला मुस्लिम समाज ही एक इहवादविरोधी शक्ति आहे असें प्रारंभी म्हटलें आहे त्याचें हें कारण आहे.
 दुर्दैवाने मुस्लिम सत्तेच्या व ब्रिटिशांच्या कारकीर्दीप्रमाणेच स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळांतहि ती शक्ति त्याच रूपांत भारतांत उभी आहे. भारतीय लोकसत्ताक शासनाच्या व भारतीय राष्ट्राच्या घडणींत ती कधीहि सहकार्य करणार नाही. म्हणून तिचें स्वरूप आपल्या इहवादी प्रजासत्ताकाची चिंता वाहणाऱ्यांनी अगदी स्पष्टपणें समजून घेतले पाहिजे. गेल्या लेखांत येथल्या मुस्लिमांचा प्रारंभां- पासूनचा इतिहास दिला आहे याचें हेंच कारण आहे. आज भारतांतील मुस्लिम समाजाची जी वृत्ति आहे, जी विचारसरणी आहे, जें तत्त्वज्ञान आहे त्याचीं पाळेमुळे बाराव्या-तेराव्या शतकांत आपल्याला दिसतात.

फाळणीची प्रस्तावना

 'दि ग्रेट डिव्हाईड' या आपल्या पुस्तकांत एच्. डी. हॉडसन या इंग्रज लेखकाने तर म्हटलें आहे की, "हिंदुस्थानची १९४७ साली फाळणी झाली त्या कथेची