पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

७५



करणारच नाही. परंतु जुना धर्म अवनत झाला होता, सुसंस्कृत जनतेची आध्यात्मिक भूक भागविण्यास तो असमर्थ होता.. दुष्ट तत्त्वाच्या जाचांतून सोडवणूक व्हावी व होईल म्हणूनच महंमदाचे अद्वैताचे साधे तत्त्व त्यांनी स्वीकारले....आफिकेच्या उत्तर प्रदेशांत या सर्वभक्षक क्रांतीचे खरे कारण नवधर्माने ( इस्लामनें ) केलेली सक्ती नसून जुन्या धर्माची अवनती व त्यामुळे उत्पन्न झालेली अगतिकता व निराशा हेच होय, सिप्रिअन, अथेन्सिअस व अगष्टाईन यांच्या शक्तियुक्तीने स्थापिलेला जीजसचा धर्म एरिअन डोनॅटिस्टांच्या दुष्ट चालींनी व कॅथोलिक पंथीयांनी विपरीत केला म्हणूनच दरिद्री जनतेने त्याचे विरुद्ध बंडाचे निशाण उभारले."

 हिंदुस्थानच्या परिस्थितीचे विश्लेषण करतांना रॉय लिहितात, " बुद्धाच्या पराभवानंतर, देशाची स्थिति अधिकच वाईट झाली. आर्थिक दुरवस्था, राजकीय जलूम, बौद्धिक बेबंदशाही ( Intellectual Anarchy ) व आध्यात्मिक गोंधळ यांनी सारा देश बुजबुजाटून गेला होता. सर्व समाज विनाश व विघटना यांच्या चक्रांत सांपडला होता आणि म्हणूनच दलित जनता, सामाजिक समता व राजकीय स्वातंत्र्य यांचे आश्वासन देणाऱ्या इस्लामी धर्माच्या झेंड्याखाली गोळा झाली."* हिंदु संस्कृतीचा निष्ठावंत भक्त हॅवेल याने आपल्या ' हिंदुस्थानांतील आर्यांचे राज्य' या ग्रंथांत या विषयावर आणखी थोडा उजेड पाडला आहे. तो म्हणतो, " हर्षवर्धन राजा सातव्या शतकाच्या मध्यास निवर्तला. इस्लामचा विकास व हिंदी राजकीय अवनती ही एकसमयावच्छेदेने


+ Historical Roll of Islam, Page 47-48.


* Historical Roll of Islam, P.97.