११३
असल्यानें इतर गोष्टींकडे पाहिजे तितके लक्ष राज्यकत्यास द्यावयास सांपडलें नाहीं.
आतां कोणतेंहि राज्य स्थापन होण्याचे वेळी साधारणतः असेच असावयाचे व पेशवाई आणखी कांहीं दिवस टिकती व इंग्रजासारख्या परशत्रूशीं त्याची गांठ इतक्या लवकर न पडती तर सर्व दंगाधोपा क्रमानें - मोडून जाऊन राज्यसुधारणा अधिक झालीच असती असेही एक म्हणणे आहे व तें विचार करण्यासारखे आहे. ऐ. ले. संग्रहांतील पत्रांचे काळी सर्वत्र दंगाघोपा होता ही गोष्ट मात्र खरी आहे व ती आम्ही येथे नमूद करितों. पेशवे मोंगलांच्या मुलखांत शिरून लुटालूट करीत चालले व पुढे राक्षसभुवनाच्या लढाईमध्ये मोगल होता की नव्हता 'असा त्यांनी करून टाकिला. यामुळे पेशव्यांचे राज्यास बढती व कीर्तीस उजळा मिळाला हे खरें, तथा पित्याच्या पश्चात् मोंगल पुण्यावर आले व शहराच्या बचावाची तरतूद नीट नसल्याने खुद्द पेशव्यांची राजधानी लुटली गेली व लोक प्राणरक्षणार्थ वाट फुटेल तिकडे पळत गेले, हि विचार करण्यासारखे आहे. पुणेशइस्वी लूट व जाळपोळ यासंबंधाची ऐले संग्रहांतील पत्र त्यांतील सविस्तर व स्फुट वर्णनामुळे फारच मनोरंजक आहेत. (पत्रे नंबर २१, २५९, २६०, २६१, २६२) " पाणी केळीवर नारळी चढतीत 'पृथ्वीप्रय मांडला आहे. " " यांत जोबांचे तो आपले प्राकनानुरूप वांचो," असे सरदारांचे उद्गार ब त्याचप्रमाणे " दादा, पुण्यातील देव एक लहानमोठा राहिला नाहीं. महादेवाच्या पिंडी व मूर्ति, गणपती, हणमंत सर्व फोडले. पर्वतीस हेंच केलें. सरकारचा वाडा, धर्मशाळा जळल्या. सिंहगडचे सरकारखाने गरीब- गुरीब व घेणाऱ्याचे गांव सात आठ, आजी रविवारी दोन प्रहरीं येऊन आगी दिल्या. तोफखान्याचे पानशांचे घराजवळ आग लाविली, तों श्री नागझरीस येऊन पोहोंचली. सोमवार-मंगळवारांत पांच सात हवेल्या जाळल्या. लोहगडचे माचीस वित्तविषय घेऊन पुण्याचे लोक राहिले होते त्यांस देखील लुटोन फरत केलें. नानाफडणवीस देखील एका वस्त्रानिशीं गडावर गेले. " व अखेर " रुपये ( खंडणी ) कबूल करून शेवटी अन गांवची राहिली नाहीं." अशी नारो आप्पाजीसारख्या शहरच्या कोतवाल ने