या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अभ्यासू लेखनात चेतनं मने जागता पहारा ठेवून असते आणि ललित लेख-
नात स्वप्नभूमी तळातून वर आल्यासारखी होते.' या दुर्गा भागवतांच्या मताप्रमाणे
खरोखरी त्यांनी गवसलेल्या सत्त्यानुसार (यशापयशाला फारसे महत्व न देता)
स्वतःला जे सत्य आणि प्रशस्त वाटत गेले ते अपेक्षेप्रमाणे. यातूनच अधिकाधिक
ज्ञान परजत गेले असल्याचे समाधान या समाधानी लेखिकेला आहे. तेव्हा त्यांनीच
म्हटल्याप्रमाणे 'अनेक अंगानी, अनेक सूक्ष्म पैलूंनी घडविलेली ही कलासिद्धी बुद्ध
प्रलोभन केवळ अपूर्व आहे हेच खरें !
xxx
३८ आलेख