संभाषणकलेमध्ये माणसांत जितका कमीजास्तपणा दिसून
येतो, तितका इतर गुणांमध्ये दिसून येत नाहीं. ज्यांच्या
बरोबर संभाषण केलें असतां मन रमेल अशीं पुष्कळ हुशार
माणसें माझ्या माहितींतलीं आहेत; पण त्यांच्या पासून ज्ञान
निवळ काढून घेतल्याशिवाय मिळावयाचें नाहीं. चांगले सं-
भाषण करणारा माणूस नेहमीं हवासा वाटतो. इतर गोष्टींप्रमाणें
ही कला देखील व्यासंगानें कमावितां येते. अभ्यास केल्या-
शिवाय कोणालाही नीट रीतीनें संभाषण करितां येणार नाहीं.
सर वुइल्यम टेम्पल ह्मणतो – “चांगलें संभाषण चार गोष्टी
मिळून झालेलें असतें”–पहिली गोष्ट - सत्य, दुसरी- समज, तिसरी
-सुखभाव, चवथी- नक्कल करण्याची शक्ति. ह्यांपैकी पहिल्या
तीन गोष्टी कोणाच्याही अंगीं असणें शक्य आहे. तरी पुष्कळ
लोकांनीं बरेंच ज्ञान संभाषणापासून मिळविलेलें असतें. बेकन
ह्मणतो–“जो वारंवार प्रश्न करील त्याला पुष्कळ ज्ञान मिळेल, व
त्याचें बरेंच समाधान होईल. परंतु विशेषेकरून ज्याला प्रश्न
करावयाचे त्याच्या ज्ञानाला अनुलक्षून प्रश्न विचारले तरच तें
प्राप्त होईल. कारण, त्याच्या योगानें ज्याला प्रश्न विचाराव-
याचे त्याला उत्तर देण्यास आनंद वाटेल, व जिज्ञासूंस सारखें
ज्ञान मिळत जाईल."
सौंदर्याचें खरें स्वरूप ओळखण्याची शक्ति मुलांत तर काय,
पण आपणांत देखील आणण्यास पुरेसा यत्न आपण करीत नाहीं.
व वास्तविक पाहिले तर इतकें शुद्ध, अनायासानें साध्य होणारें,
मोल न पडतां मिळणारें, व नेहमीं आपल्या ठिकाणीं वास कर-
णारें असें दुसरें तें कोणतें सुख ! सृष्टींतील देखावे, वृक्ष, दाट
पालवी, फलपुष्पें, निळें आकाश, लोंकरीसारखे दिसणारे ढग,
चकाकणारा समुद्र, सरोवरावरील वीचितरंग, नदीपात्रांवरील
पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२