हृदयांत जीवंत पाण्याचा झरा असतो, फक्त त्यानें तो स्वच्छ ठेवावा.”
"कांहीं भावना माणसांना दिलेल्या असतात त्या भावनांत ऐहिकपणापेक्षां दैविकपणा जास्त असतो'."
सिसरो ह्मणतो तें खरें आहे – “चांगल्या माणसाशिवाय कोणाला सुख नाहीं, किंवा सर्व चांगलीं माणसें सुखी आहेत हें खरें असलें, तर तत्वज्ञानाशिवाय दुसरे कोणतें ज्ञान जास्त उन्नतीस आणण्याच्या योग्यतेचें आहे ? व सद्गुणाशिवाय जास्त दैविक काय आहे ?"
माणसांच्या शक्तीच्या बाहेर त्यांची सत्वपरीक्षा होत नाहीं हैं अगदीं खरें आहे; मात्र तें आपणांस विश्वसनीय वाटत नाहीं. परंतु ईश्वर सत्यनिष्ठ आहे, मोहाचा प्रतिकार करण्याचें जितकें सामर्थ्य तुमच्या अंगीं असेल त्याच्या पलीकडे तुह्मांला तो मोह पडूं देणार नाहीं, व त्यांतून तुझीं सुटावें ह्मणून त्या मोहाबरो- बर त्यांतून सुटून जाण्याचा मार्गही दाखवून देईल.
तरी पण माणूस इतका चंचलवृत्ति आहे कीं, आपणांस असें सांगितलें आहे:- “ आपल्या सत्वपरीक्षेचे प्रसंग येऊं नयेत अशी प्रार्थना करा. कारण, आत्मा परीक्षेस तयार असतो पण देह अशक्त आहे.”
पूर्णतेकडे आपला रोख असला पाहिजे.ज्याप्रमाणें आका- शांतील बाप पूर्ण आहे त्याप्रमाणें तुह्मी व्हा.
त्याबद्दलचें बक्षिससन्निध आहे व तें अपरिमित आहे.आपली बरीच संकटें
आपल्यांतच असतात. भ्रमामुळे माणूस त्रास करून घेतो. डॉनियलप्रमाणें आपल्याला ह्मणतां येईल - "माझ्या डोक्यां-
१ स्कॉट.