“परंतु ईशान्येकडून बर्फीच्या वादळांतून सोसाट्यानें वहात
येणारा, अंगास झोंबणारा वायु आमचीं ओक लांकडाचीं गलबतें
पृथ्वीसभोंवतीं समुद्रांत नेतो; व आमच्या हृदयांत असलेलें
व्हायकिंग लोकांचें पाणी जागृत करितो; आमच्या मेंदूस व स्ना-
यूंस बळकटी आणितो; ईश्वरप्रेरित वायो, संथपणें वहा."
आपलीं संकटें हा नैतिक गार वारा होय. त्यामुळे आपण
बळकट होतों व अंगांत कुवत येते.
" ख्यातीच्या भपकेदार पोषाखाला मागे टाकणारीं व नाय-
काच्या शौर्याला भर आणणारीं, व त्याला मुकुटाप्रमाणें शोभवि-
णारीं संकटेंच होत. हीं जर संकटें आलीं नाहींत तर एक लढाई
जिंकायची राहिली व नायकाच्या मनोनिग्रहाला एक स्तुत्य जय
मिळाला नाहीं. "
एपिक्टेटस ह्मणतो—“ जर सिंह, अजगर, हरिण, रानडुकर,
आणि ज्यांना हाकून टाकण्याचें व नाहींतशीं करण्याचें
प्रयोजन आहे, अशीं पशुवत् वागणारी माणसें नसती तर हरक्यू-
लिसची काय महती! असलीं मोठीं कृत्यें करावयाचीं नसती तर
त्यानें काय केलें असतें ? पासोडी पांघरून तो निजला असता
असें नव्हे का ? असल्या ऐषारामांत सुस्थतेंत लोळत पडला
असता तर तो पहिल्यानें हरक्युलीस ह्या नांवानें प्रसिद्धीस आ-
लाच नसता. यदाकदाचित् आला असता, तरी त्याचा काय
उपयोग ? त्याच्या बाहुद्वयाचा, त्याच्या इतर अवयवांचा, त्याचा
सोशिकपणा, त्याचें उदार मन, इत्यादींचा, जर असल्या गोष्टींनीं
व प्रसंगांनी त्याला जागृत केलें नसतें किंवा आपलें बळ खर्चा-
वयास लावलें नसतें, तर काय उपयोग झाला असतो ?”
१ टेलर.