हिंदुस्थान आमच्याकडे आहे हें जरी मोठें जोखीम तरी तें एकच जोखीम आमच्यावर आहे असें नव्हे. पृथ्वीवरील इतर मोठमोठ्या राष्ट्रांशी आमचा व्यवहार असतो. मोठमोठे प्रश्न उद्भवतात; व पुढें देखील उद्भवतील. त्या वेळीं दोन्ही पक्षांनी शहाणपणा, नेमस्तपणा, क्षमाशीलपणा इत्यादि बाळगले पाहिजेत. कोणत्या ठिकाणीं पड घ्यावयाची, कोणत्या ठिकाणीं हेका चाल- वावयाचा हे आपल्या मुत्सद्यांस कळलें पाहिजे; व कोणता पक्ष स्वीकारावा हें लोकांस देखील समजलें पाहिजे.
मोठमोठ्या राष्ट्रांची मालिका धुळीस मिळाली असें मानवी जातीच्या इतिहासावरून कळते. इजिप्त, असीरिया, पर्शिया, रोम हीं वर्चस्वास चढलीं व नाहींतशीं झाली. आजकाल जिनोवा, व व्हेनिस पुष्कळ अंशीं आरमार, वसाहती व व्यापार ह्यांच्या जोरावर भरभराटीस आली. त्याप्रमाणें सध्यां आपलें चाललें आहे. त्यांची जी दशा झाली त्यांतून आपणांस सुटाव- याचें असल्यास त्यांनीं केलेले प्रमाद टाळले पाहिजेत. "राष्ट्रें रचावयास हजार वर्षे पुरत नाहींत, तींच मोडावयास क्षण पुरा होतो. "
आपल्या बाह्य राज्यधोरणाविषयीं ह्मणाल, तर इतर राष्ट्रांशीं मित्रत्वानें वागणें हें आपलें कर्तव्य आहे इतकेंच नव्हे, तर त्यांत आपला फायदा आहे. दुर्दैवानें राष्ट्रें एकमेकांस शत्रु मानि- तात. तथापि शुद्ध ज्ञानप्रकाशानें असें दर्शविलें जातें कीं, आपण सर्व माणसें आहोंत, तेव्हां आपणांस एकमेकांशी मित्र- भावानें वागलें पाहिजे. एका वेल्श पायानें साध्या पण सहज कळण्याजोग्या रीतीनें हैं तत्व उदाहरण सांगून एकदां सम- जावून दिलें. तो ह्मणालाः - मी एके दिवशीं फिरावयास निघालों;
१ बायरन.