पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण भाजीला ना खमंग चव ना भाकरीला गोल भिंगरी आकार. सासू शिकची, पण शेवटी ती सासू. तिची टाच उंच आहे याचे तिला सतत भान असतेच. मग ती थोड्याफार शिव्या घालायची. कधी एखादा सटका द्यायची. पण त्याबदल दैवाची तक्रार नाही. कारण सासू कशी असते. त्याचे चित्र तिच्या आईने लग्नाआधीच जोरदार रंगवले होतो. त्या चित्रपेक्षा तर ही बरीच होती म्हणायची! पण बावीस वर्षाच्या नवऱ्याबरोवर चौदा वर्षाच्या पोरीचे सूत काही जुळेना. सकाळी उठल्यावर कंबर ठणकायची. पाय जडावून जायचे. सगळे अंग ठसठसायचे. लग्नातल्या नव्या साडया, पायातल्या चंदेरी साखळ्या, गळ्यातले पिवळे धमक डोरले, ... हे सारे छान वाटायचे. पण लग्नाचा हा नवा अर्थ उमजत नसे. संध्याकाळ झाली की अंगावर शहारे येत. पळून जावेसे वाटे. आणि दोनदा रात्री पळत ... धावत तिने माहेरची शीव गाठलीही होती. पण लगीन झालेल्या लेकीला माहेर परकेच असते. आईने तिचा जीव ओळखला. कदाचित तिचे दिवस आठवले असतील.
"बाई गं सगळ्याच बायांना जात्यातून जावं लागतं

काय सांगू भर्ताराच ? जीव त्याच्यात मुरला
केवड्याचा गंध जुईफुलानं सोशिला....!!"


 "चार दिवस होतोय तरास. तो सोसावाच लागतो. एखादं लेकरु झालं की भरताराची गोडी बायकुलाबी कळाया लागते. तरास सोसाल्याबिगर गोडी कशी मिळणार ?......"

 असे काही सांगून तिने पहिल्या वेळी दैवाला सासरी जाऊन घातले. पण दुसऱ्या वेळी मात्र बापाने कायदा हातात घेतला. दोन दणके घालून रोखठोक बजावले. "आता तुझं घर त्ये. विसाव्याला दोन दिसासाठी म्हायेराला ये. पन नवऱ्याच्या गोडीनं, सासू सासऱ्यानं धाडलं तरच यायचं. आम्ही पन जमंल तशी चोळी बांगडी करू. शिदोरी देऊन वाट लावू. पन जर का या पुढं पळून आलीस तर पाय तोडून नवऱ्याच्या अंगणात नेऊन घालीन. तुझी तिरडी नवऱ्याच्या घरुनच निघंल. त्या गावची शीव वलांडीस तर याद राख ....."

 तेव्हापासून माहेरची आशा तुटली. नवऱ्याला परळीत चांगली नोकरी मिळाली. मुंबई-पुण्याला जाणाऱ्या मालट्रकवर ड्रायव्हर म्हणून. आठशे रुपये मिळत. शिवाय वरची कमाई वेगळीच. लग्नाला दीड वर्ष झालं

आपले आभाळ पेलताना/७८