पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी अत्यंत अस्वस्थ होते. आपण व्यवहाराचा विचार करतांना, आपल्याच विचारांच्या विरुद्ध आचरण करतो आहोत अशी बोच मनाला होती. वकिलांना माझे मन कळत होते. पण तेही मला पुन:पुन्हा व्यवहार सांगत. ग्रामीण भागातील निरक्षर आणि तरुण परित्यक्तांच्या पुनर्वसनाचा विचार करतांना विचारांची चौकट पुनःपुन्हा पारखून घ्यावी, पुढे काय घडू शकते याचे अंदाज घेऊन निर्णय घेणे महत्वाचे आहे, असे सतत पटवीत आणि धाडसानेच हा निर्णय घेतला. पहिली दोन वर्ष सुधीची खबर कळत असे. आमची संवादिनी - कार्यकर्ती भेटूनही आली होती. पण गेल्या पाचसात वर्षात काही कळलं नव्हतं.
. ......
वर्षावर वर्ष उलटत होती. आणि आज सुधी नि बिट्टू समोर होते. "ताई मी हितं घर करतेया. बिट्टू आता पाचवीला गेलाय. चौथीला तालुक्यात तिसरा आला. हितलं शिक्षण चांगलंगा. खोली केलीय. तुमचीबी सावली मिळेल....."

माझ्या डोक्यातला प्रश्न तिला उमजला असावा. तिनं बिट्टूच्या हातात बिस्कीटचा पुडा देत सांगितलं.
"बिट्टू, हितल्या लेकरांची वळख करून घे. त्यानला बिस्किट दे. तू बी हितं होतास बर का लहानपाणी!"

 माझ्याकडे वळून ती बोलू लागली.

 "ताई मी ठीक हाय. बिट्टूच्या पपानं मारहाण केली न्हाई. तुमी तवाच बिट्टूच्या नावाने चार एकर रान नि घराचा अर्धा भाग करायला लावला होता. तुमच्या म्होरं कबूल केल्यापरमाने दररोज इस रुपये देत. आता पंचवीस देतात. मी एका दुकानातल्या सुपाऱ्या रोज फोडून देते. ती दुसरीपण बरी हाय. येगळ्याच ऱ्हातो. पन कधीमधी भेटतो. तिचा तरी काय दोस ? आम्ही अडानी. आमचे मायबाप अडानी. नवरापन सातवी झालेला. सरकारचे कायदे कानून आमाला सांगनार तरी कोन ? नि कळणार तरी कसे? .....बैलाने जू वढावा तसा संसार वढायचा. पोरगा हीच दौलत, त्याचे पपा येतात अधूनमधून. पन पहिल्यासारखं सूत काही जमलं नाही." येते. हिते आले नि वाटलं म्हायेराला आले. भेटते समद्यास्नी. येईल पुन्हा. सुधामतीचं वय अजूनही तिशीच्या आतच असेल. तिच्या वयाच्या कितीतरी शहरी वा मध्यमवर्गीय मुली शिक्षण घेत असतील..... सुंदर सुंदर स्वप्नांच्या

आपले आभाळ पेलताना /६५