पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना


 सामाजिक प्रश्नांविषयी उभ्या रहाणाऱ्या चळवळींमध्ये; विचारव्यूह, अनुभव आणि संस्थात्मक कार्य यांचे नेमके नाते काय असावे ? प्राथमिकता आणि अग्रक्रम कशाला द्यावा? असे प्रश्न सतत पुढे उभे राहतात. कोणत्याही तीव्र सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या चळवळीत अभ्यास आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाचा मेळ कसा घालायचा? दूर पल्ल्याचा विचार आणि तातडीचे प्रश्न या दोन्हीचा आवाका पेलणारी कार्यपध्दती कशी निर्माण करायची हे निर्णय सोपे नसतात. चळवळ करणाऱ्या कार्यकत्यांना काहीवेळा दैनंदिन कामाला बांधून ठेवणारे संस्थात्मक काम नकोसे वाटते. पण ज्यांचे प्रश्न असतात त्यांना संस्थांचा आधार हवासा वाटतो. संस्था उभारणीचा आधार खरे तर कार्यकर्त्यांनाही होतो. पण त्यांचे भय वा शंकाही निराधार नसतात. कारण संस्थात्मक कामामध्ये काहीवेळा कार्यकत्यांचे प्रशासक होतात- चळवळीतील विचारांची धार कमी होते, असेही होते. शेवटी प्रत्येक प्रश्नांभोवती भ्या रहाणाऱ्या चळवळीत परिणामकारकतेचाही मुद्दा महत्त्वाचा, निर्णय अनेकदा त्या अंगाने घेतले जातात.
 आज ही चर्चा करण्याचे कारण माझ्यासमोर प्रा. शैला लोहिया यांच्या ग्रंथाचे हस्तलिखित आहे. शैलाताई आणि त्यांचे पती डॉ. व्दारकानाथ लोहिया अनेकवर्षे आंबेजोगाई येथे कार्य करीत आहेत. ग्रामीण भागात कार्य करताना एककलमी कार्यक्रम आखता येत नाहीत या जाणिवेने 'मानवलोक' 'दिलासा' 'मनस्विनी प्रकल्प' आणि गांवागांवातील शेतीपाण्याचे प्रकल्पं असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. पण या पुस्तकातील लेखांचा संदर्भ आहे तो स्त्रीप्रश्नांचा! वेगवेगळ्या कारणाने डोक्यावरचे छप्पर गेलेल्या स्त्रियांना 'दिलासा' त आश्रय मिळतो. ही येणारी प्रत्येक मुलगी-बाई म्हणजे एक कथाच असते. या विविध मुलींच्या ज्या वेगवेगळ्या समस्यांनी त्यांना 'दिलासा'त आणले त्या या लेखांमधून शैलाताईंनी मांडलेल्या आहेत.
 महाराष्ट्रात वीसतीसच्या दशकात स्त्रीप्रश्नांविषयीची जागृती, हिंगणे स्त्री संस्थेतून संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या असंख्य कार्यकत्यांचे संस्थाकारण यातून लेखन झालेले आहे. ठळकपणे लक्षात येण्याजोगी श्रीमती मालतीबाई बेडेकर, श्रीमती कृष्णाबाई मोटे, श्रीमती शांताताई निसळ, श्रीमती शशिकला जाधव अशा लेखिकांनी संस्थेकडे येणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या लिहिलेल्या आहेत. समाजशास्त्राच्या अभ्यासात ज्याला 'केस स्टडी' म्हणतात त्याला आपण 'विशिष्ट प्रकरण' म्हणू आणि असे करतांना प्रकरण शब्दाला असणारे कुत्सित अस्तर काढून टाकू. कोणत्याही अभ्यासात सूक्ष्म (Micro) आणि बृहत्