पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वातंत्र्याच्या चार दशकातील : राष्ट्रभाषा हिंदीचा विकास

 आपल्याला माहीतच आहे की आपला देश १९४७ साली स्वतंत्र झाला. बघता बघताच आपल्या स्वातंत्र्याने सात दशकांचा दीर्घ पल्ला ओलांडला आहे. कोणत्याही गोष्टीच्या मूल्यांकनासाठी सत्तर वर्षांचा काळ खूप मोठा असतो. अशा स्थितीत स्वातंत्र्याच्या नंतरच्या गेल्या सत्तर वर्षांत राष्ट्रभाषेच्या रूपात हिंदीने विकासाची जी पावले उचलली आहेत, त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केले पाहिजे. राष्ट्रभाषा म्हणजे प्रत्येक देशाचा असा मानदंड असतो, ज्यावर देशातील प्रत्येक नागरिक अभिमान बाळगतो. राष्ट्रभाषेशिवाय स्वतंत्र तसेच समृद्ध राष्ट्राची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. आयरिश कवी थॉमस डेविसने म्हटले आहे की, “राष्ट्रभाषेची समृद्धी ही देशाच्या सीमा रक्षणापेक्षा अधिक महत्त्वाची असते. त्याच्या विचारांच्या गांभीर्याकडे आपण क्वचितच लक्ष दिलेले आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. घटनेनुसार हिंदी आमची राजभाषा आहे. पण राजभाषा म्हणून हिंदीचा जो विकास व्हायला पाहिजे, तो गेल्या चाळीस वर्षांत आम्ही अजूनही करू शकलेलो नाही. राष्ट्रभाषा, राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्हासारख्या मानदंडाच्या प्रतीबद्दल आम्ही देशाला विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाहतो आहोत. भाषावाद, प्रांतवाद, सांप्रदायिकता, जातीवादासारख्या असामाजिक तत्त्वांनी आम्हाला अगदी जखडून ठेवले आहे. अशा स्थितीत एकांत्मतेची किल्ली असणाच्या राष्ट्रभाषेला आपण मजबूत केले पाहिजे. भाषेत देशाला जोडण्याची आणि पुढे नेण्याची शक्ती असते. याचा स्वीकार करून आपण राष्ट्रभाषेला मजबूत करण्याचा प्रयत्न अवश्य केला आहे. आम्ही वृत्तपत्राद्वारे, प्रसार माध्यमे, साहित्य, लोकभाषा यासारख्या अनेक मार्गांनी याचा प्रचार आणि प्रसार केला; पण राष्ट्रभाषेचा विकास म्हणजे मुळात एक स्वकेंद्रित मानसिक प्रक्रिया आहे. राजकीय प्रसारांमुळे कोणतीही भाषा ख-या अर्थाने ना राजभाषा होऊ शकते ना राष्ट्रभाषा. लोक जेव्हा तिचा मनापासून स्वीकार करतील तेव्हाच हे शक्य होईल.
 घटनेनुसार भारतातील विभिन्न प्रांतांतील पाच बोलीभाषा म्हणजे आमचीआकाश संवाद/५९