पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशिक्षित लोकांना मुक्त केले तेच दुसरीकडे जमीनदार आणि सावकाराच्या तडाख्यातून शेतक-यांना. तत्कालीन शेतकरी, कष्टकरी इत्यादींची स्थिती वेठबिगार मंजूरांपेक्षा कमी नव्हती. चोवीस तास ते जमीनदार आणि सावकारांचे गुलामच होते. पिकावर पहिला अधिकार जमीनदार आणि सावकारांचा असायचा. रक्त, घाम गाळूनसुद्धा त्यांना शिल्लक राहिलेल्यावर गुजराण करावी लागे. आजोबांचे कर्ज नातवाने फेडायचे, तेही फक्त व्याज. मूळ मुद्दल पिढ्यानपिढ्या तसंच राहिले जायचे. बिचारे शेतकरी घरदारसुद्धा जमीनदार सावकाराच्या जवळ गहाण ठेवत होते. शेतकरी, कामगारांची ही दयानीय अवस्था बघून महात्मा फुले यांना खूप वाईट वाटत होते. शेतक-यांच्या ह्या दयनीय अवस्थेचे चित्रण त्यांनी शेतक-यांचा आसूड' ह्या शीर्षक ग्रंथात अत्यंत मार्मिकपणे चित्रित केले आहे. आपल्या सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठाद्वारे त्यांनी शेतक-यांच्या अधिकारांविषयी जनतेला जागृत केले. या समाजाद्वारे शिक्षणाला सर्वसुलभ बनविण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे एक ऐतिहासिक कार्य आहे. आज शिक्षणाचा जो सार्वत्रिक प्रचार दिसून येतो, त्याचं श्रेय महात्मा फुल्यांच्या जीवन कार्यालाच द्यावं लागेल.
 महात्मा फुले यांच्या जीवन कार्याच्या विहंगमावलोकनावरून स्पष्ट होत की आधुनिक महाराष्ट्राच्या मूलभूत सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात त्यांची नेहमी आठवण काढली जाईल. स्त्री मुक्ती, दलितोद्वार, शिक्षण प्रसार इत्यादी क्षेत्रात त्यांनी पुरोगामी दृष्टिकोनाची स्थापना केली. विषमता, रूढी प्रामाण्य इत्यादीला दैवी अधिष्ठान देणाच्या धर्मसत्तेविरुद्ध त्यांनी संघर्ष आणि संघठनाद्वारे आवाज उठविला. दलित आणि पीडित जनतेला स्वाभाविक मानवी अधिकार देऊन त्यांचे जीवन सुलभ बनविले. नवशिक्षित बहुजन समाजाला त्यांनी

आपल्या कर्तव्याविषयी जागरूक केले. समाजातील सगळ्यात दरिद्री वर्गाबरोबर त्यांनी आपले नाते कायम केले. पीडित आणि दलित वर्गाबरोबर असणा-या त्यांच्या कृतिशील सहानुभूतीतच त्यांचे मोठेपण अंतर्भूत आहे.

आकाश संवाद/५८