=== तळागाळातील लोकांचा विचार ; पण ===
=== मध्यमवर्गाची कंबरमोड ===
वाढत्या मंदीच्या काळात या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून आपण
उत्सुकतेने बघत होतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सकाळी ११ वाजता या
दशकाचा अंतिम अर्थसंकल्प सादर झाला. मा. यशवंत सिन्हा यांनी कृषी व
उद्योगांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा सुचविणारा अर्थसंकल्प मांडला आहे.
या दशकाच्या सुरुवातीपासूनच आपण बाजार व्यवस्थेकडे वळलो आहोत.
आणि अनेक आर्थिक बदल व अरिष्ठ आपल्या जवळच्या देशांना सोसावे
लागल्याने त्याचा परिणाम भारतावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झाला आहे. मुख्य
म्हणजे जागतिक मंदीचा परिणाम आपण भोगत आहोत.
१९९७ पासून किंमत वाढ भारतामध्ये झाली आहे, असे श्री. सिन्हा मान्य
करून म्हणतात की, या वाढीला ५ टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न केलेला
आहे. या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, किंमत वाढ जर ४ टक्के असेल
तर प्रत्यक्षात (ग्राहकांपर्यंत या वस्तू पोहचेपर्यंत) ती ६ टक्के झालेली असते,
म्हणजेच ती साधारणपणे २ टक्क्यांनी वाढलेली असते. प्रत्यक्षात सामान्य
ग्राहकांना कोणत्याही आवश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली अल्प वाढ बरीच
बोचणारी असते.
Photo source esakal.com