पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

अ. जिल्हा क्र. एकूण कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे टक्केवारी १. नंदुरबार २२११३७ । १६६७९९ ७५.४३ २. गडचिरोली | १८०११७ । ९३८९ ५५.१८ ३. ठाणे ४०२१६९ । २०९५२४ । ५२.१० ४. भंडारा ४४३९९८ । २२९१०२ ५. अमरावती | ४२३६४१ १८४९३२ ५१.२८ २५९७३१ । १३१०१३ । ५०.४४ ७. वाशिम १९२०३८ ९२८४२ ४८.३५ | ८. चंद्रपूर ३१६८९२ । १४८६९७ ६.९२ । ९. अकोला | २२२७२७ । ९९१३६ १०. वर्धा १८२००० ८०८९० ४४.४२

 वरील तक्त्याच्या माहितीवरून असे दिसून येते की, १० जिल्ह्यांपैकी ०७ जिल्हे विदर्भ क्षेत्राचे आहेत. ह्या ठिकाणी सर्वाधिक असंघटित क्षेत्रे आहेत.ह्या जिल्ह्यांचा एकूण विकास मागासलेला असल्याने दारिद्रयाचे प्रमाण अधिक दिसून येते. गडचिरोली जिल्ह्याची स्थिती विदर्भात सर्वात मागासलेली आहे. त्यामुळे मानवीय विकासासाठी भरपूर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
 संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पाची २००० सालासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष वापरून राज्यातील परिस्थितीचे विश्लेषण केल्यास असे दिसते की, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागासलेपणाचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे राज्याचा मानव विकास निर्देशांक केवळ ०.५८ इतकाच येतो. फक्त ०९ जिल्ह्यांची सरासरी जास्त आहे. यात विदर्भात फक्त नागपूरचा विकास झाला आहे. नागपूरचा मानवीय विकास निर्देशांक ०.७१ झाला आहे. मराठवाड्यात मात्र एकही जिल्हा ०.५८ निर्देशांकाच्या वर आलेला नाही.औरंगाबादचा निर्देशांक राज्य सरासरीच्या जवळपास म्हणजे ०.५७ आहे.
 महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील कोकणासह काही भाग पूर्वेकडील भागापेक्षा जास्त विकसित आहेत. तरी पश्चिम भागातील थोडे जिल्हे मागासलेले आहे. यात नंदुरबार व धुळे जिल्ह्यांचा समावेश आहे. साक्षरता व आरोग्यावर सध्या भर दिला जात आहे. तेव्हा साक्षरतेत गेल्या १० वर्षात भरपूर सुधारणा झाल्या आहेत. तरीदेखील आरोग्य विषयक उदासीनता दिसून येत आहे. ही एक गंभीर बाब आहे.
उपाय :

 जर देशात ८ टक्के समग्र आर्थिक वृद्धी (GDP) चे लक्ष पूर्ण करायचे असेल तर कृषी क्षेत्र, असंघटित क्षेत्रात सातत्याने वाढ करणे गरजेचे आहे.

अर्थाच्या अवती-भवती । १२५