पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



हतो वा प्राप्यसि स्वर्गम
जित्वा वा भोक्ष्यसे महीम्



 ह कैसा सामना है; सामना तो समानवालों में होता है. एक मोटा तगडा पहिलवान और दूसरा भूखा, बीमार ऐसे दोनों में कुश्ती कैसे हो सकती है?, भाषण खणखणीत चालले होते. वक्ते होते पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल. स्थळ चंडीगड. प्रसंग भारतातील सर्वांत मोठ्या आणि मान्यवर शेतकी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या समारंभाचा.
 चंडीगड म्हणजे पंजाब, हरियाना आणि केंद्रशासित चंडीगड या तिघांची राजधानी. पंजाब आणि हरियाना ही दोन राज्ये हिंदुस्थानातील सर्वांत प्रगत शेतीची. उद्घाटनप्रसंगी, साहजिकच, हिंदुस्थानच्या शेतीची आजची परिस्थिती काय आणि भविष्यातील आव्हाने काय असा विषय होता.
 प्रकाशसिंग बादल यांच्या आधी बोलले चौधरी चौताला – हरियानाचे मुख्यमंत्री.

 साऱ्या हिंदुस्थानातील, अगदी हरियानातीलदेखील, शेतकऱ्यांची कशी दुर्दशा दुर्दशा झाली आहे याचे त्यांनी मोठ्या ओघवत्या हिंदीत वर्णन केले. मुळात शेती तोट्याची; भांडवल नाही, शेती परवडत नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर, काही वेगळे करायला जावे तर वाटेत पेटंटचा अडथळा, पेटंटच्या विळख्यातून कशीबशी सुटका करून घेतली तर जागतिक व्यापार संस्थे (WTO) चा राक्षस पुढे उभा ठाकलेला. सरकारने आयातीवरील बंदी उठवून टाकली, कारण WTOचे नियम. बंदीच्या ऐवजी आयातकर लावले, ते इतके किरकोळ, की परदेशांतून येणाऱ्या वारेमाप आयातीला त्यांची पुसटशीही झळ लागली नाही. आता करावे काय? शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. आता ते सरकारात जाऊन बसले आहेत. ते काही चमत्कार करून दाखवतात काय तेवढे पाहायचे आहे. हा चौतालांच्या भाषणाचा मथितार्थ. नंतर सरसावून उठले प्रकाशसिंह बादल. शेतकऱ्यांच्या कैवाराचा आव

अन्वयार्थ - दोन / १२५