पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 देश जळो, नोकरदार मजेत
 इंग्रजीत 'जी, प्रधानमंत्रीजी' (YES' PRIME MINISR) हे मोठे गाजलेले पुस्तक आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते मोठे आवडते पुस्तक होते. निदान टेलिव्हिजनवर याचे झालेले रूपांतर राजीवजींना बेहद पसंत होते. या पुस्तकातील एक कहाणी उद्बोधक आहे, इंग्लंडवर मोठे आर्थिक संकट येते, सरकारी अंदाजपत्रकात कठोर काटछाट करण्याची धडपड चालू होते. शिक्षण खात्यात अगदी वैद्यकीय सेवेतसुद्धा कपात करण्याचे ठरते, खासदारांची बऱ्याच काळ टांगत पडलेली पगारभत्तावाढीची मागणीदेखील फेटाळली जाते; पण अशा परिस्थितीतसुद्धा सगळ्या नोकरदारांचे पगार भरमसाट वाढवणारा प्रस्ताव लादला जातो. असे हे मोठे विनोदी आणि वास्तविक प्रहसन आहे. हे असे का होते?
 नवे संस्थानिक
 १९६७/६९ मध्ये गोवधबंधीच्या मागणीसाठी जनसंघाने राजधानीत धुमाकूळ घातला. त्यात शेकडो नोकरदारांच्या मोटारगाड्या जळून खाक झाल्या. दंगलीत झालेले नुकसान विमा कंपन्याही भरून देत नाहीत; मग या बिचाऱ्या मोटारमालक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कसे होणार? अशी चिंता वाटू लागते न लागते तोच एक सरकारी फतवा निघाला आणि या नोकरदारांना केवळ नुकसानभरपाईच नाही तर नवीन गाड्या मिळण्याकरिता खास कोटा देण्यात आला.
 देशात कोट्यवधी बेकार आहेत. कोट्यवधी भूकेकंगाल आहेत; पण मुठभर भाग्यवंत सरकारी नोकरदारांना गडगंज पगार आहे. महागाई भत्ता आहे. घरभत्ता आहे. मोठ्या शहरात राहण्याबद्दल विशेष भत्ता आहे. दुर्गम भागात नेमणूक झाल्यास वेगळा भत्ता आहे, हक्काची रजा आहे, नैमित्तिक रजा आहे. सुट्याच इतक्या, की यंदा १ एप्रिल ते १५ एप्रिलच्या पंधरवड्यात सरकारी कचेऱ्या फक्त ३ दिवस नावापुरत्या का होईना उघड्या होत्या. सुट्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासभत्ता आहे, येण्या-जाण्यासाठी गाड्या आहेत. टेलिफोन अमर्याद उपलब्ध आहे. मुलांच्या शिक्षणासाठी भत्ते आहेत, प्रवासभत्ते आहेत, परदेशयात्रा आहेत आणि एवढे करून काडीची जबाबदारी नाही. जनतेला नाडणे आणि पिडणे एवढीच त्यांची कर्तबगारी! पण या नव्या संस्थानिकांच्या थैल्यांना बोट लावण्याची कोणती हिंमत होऊ शकत नाही.
 जनता हरली

 बिजू पटनाईकांच्या आधी महाराष्ट्रात वसंतदादा पाटलांनी ते मुख्यमंत्री असताना

अन्वयार्थ - एक / ९०