पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि संशोधनाने टळेल.
 डंकेलची धास्ती, पेटंट हक्काची भीति कोणाला वाटते? आधुनिक वैद्यकाची नवी 'शीतलादेवी बनवून, स्वतःची तुंबडी भरणाऱ्या भगतांना विलायती औषधे महागली तर उपचार महाग होतील याची चिंता नाही. लोक कायमचे पर्यायी, अधिक परिणामकारक आणि कमी खर्चिक वेद्यकाकडे जातील; बहुराष्ट्रीय पॅथीच्या नकलेची 'इंडिया'पॅथी धोक्यात येईल आणि भारतवैद्यक पुढे येईल ही त्यांची खरी चिंता आहे. असे घडले तर पाश्चिमात्य विद्येची अडत कशी चालेल? जिभेवर शब्द बहुराष्ट्रीय कंपन्याच्या विरोधाचे; पण कृती त्या कंपन्यांना पर्याय देण्याची; नाही त्यांचीच भ्रष्ट नक्कल करून आपले दुकान चालवण्याची!
 पटकन आठवले-चंपारण्याच्या जंगलप्रदेशात जाताना औषध म्हणून मोहनदास करमचंद गांधी यांनी ('महात्मा' ही उपाधी त्यांना चंपारण्यात मिळाली.) फक्त चार वस्तू नेल्या. आयोडिन, गंधक-मलम क्विनिव आणि एरंडेल. भारतीय जनतेच्या ९० टक्के रोगांचे आणि आजारांचे उपचार करण्यासाठी या चार गोष्टी पुरेशा असतात असा त्यांचा आग्रह होता. १९९३ सालच्या तीन घटना; पण त्यांचा 'अन्वयार्थ लावण्यासाठी संदर्भ लागतो तो १९१७ सालच्या एका साध्या घटनेने.

(२१ जानेवारी १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २०३