पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खरी स्थिती अशी आहे, की जातीयतेला विरोध कोणाचाच नाही. केरळमध्ये, ईशान्येतील राज्यांमध्ये काँग्रेस उघडउघड जातीयवाद्यांशी हातमिळवणी करते. महाराष्ट्रातील काँग्रेसची सर्व उभारणीच जातीच्या आधाराने आहे आणि वसंतराव नाईकांपासून वसंतदादा पाटलांपर्यंत काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले नसते तर शिवसेना शिवाजी पार्कच्या बाहेर पसरली नसती. हातात कायद्याची शस्त्रे भरपूर आहेत, ती वापरण्याची ज्यांची हिमत झाली नाही त्यांनी नवीन कायद्याचा हव्यास धरणे याचा अर्थ एकच -
 शंकरराव चव्हाणांचे बिल हा शासनाचा स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे!

(२० ऑगस्ट १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १२६