पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. इथं नियतीचा काय संबंध?"
 सगळी उत्तरं व कारणं नियतीत शोधणाऱ्या मोरयाला अक्षय म्हणतो, “गावाचा प्रश्न पुनर्वसनानं सुटेल. ओढ्याचं पाणी वळवून सुटेल. ते विज्ञान करेल. राज्यकर्ते करतील. येथे तुमची श्रद्धा, तुमचं दर्शन कुठे तरी फोल आहे असं नाही वाटत तुम्हाला?" हा प्रश्न मोरयाला विचारलेला असला, तरी तो सगळ्याच पारलौकिकवादी आध्यात्मिकांना विचारलेला आहे. अक्षयच्या निमित्ताने लेखक आपला विज्ञाननिष्ठ भौतिकवादी दृष्टिकोन पूर्ण ताकतीने प्रकट करतो आहे आणि ठसवणं आजही पूर्वीइतकंच महत्त्वाचं आहे. (भव शून्य नादे) 'काश्मीर की बेटी' आणि 'गद्दार' ह्या दोन्ही कथा सभोवतालच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित नसल्या, तरी त्याचा आमच्या राष्ट्रीय भावनेशी सतर्कतेच्या दृष्टीनं जरूर संबंध आहे.
 सारा, निगार आणि अब्बू यांच्या संवादातून खालील तथ्ये आपल्या हाती येतात.
 B काश्मीर समस्या भारत-पाकिस्तान अशी द्विपक्षीय नसून तिसरा पक्ष काश्मीरी अवाम आहे.
 B काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे भारतीय नेते मानतात.
 B पाकधार्जिणे हुरियत नेते व पाकिस्तानच्या प्रॉक्सीवॉरमुळे मूळचा हरिसिंग प्रणित दुबळा प्रस्ताव नगण्य झाला आहे.
 B फा. अब्दुलाच्या जमान्यापासून काश्मीरी अवाम आझाद काश्मीरचे स्वप्न पाहात आली आहे.
 B भारतात खाजगीमध्ये एल. ओ. सी. आंतरराष्ट्रीय सीमा करावी व काश्मीरला जास्तीत जास्त स्वायत्तता द्यावी.
 B काश्मीरीयत म्हणजे पंडितांसोबतची मिलीजुली अदबी रिवाजांची सुफियाना जीवनशैली.
 B आणि समजा, आंतरराष्ट्रीय दबावामुळे असं स्वतंत्र काश्मीर अस्तित्वात आलं तर पाक व त्याचा गाढा दोस्त चीन तत्क्षणी झडप घालून काश्मीरचा घास घेईल. ही काल्पनिक भीती नाही तर ही वस्तुस्थिती आहे.
 लेखकाचं मनोगत व्यक्त करणारे कथेतील शेवटचे तीन मुद्दे वस्तुनिष्ठ किती आणि भावनिक विरेचन करणारे किती? हे तर काळच सांगेल. परंतु लेखकाचे प्रतिपाद्य हे भारतीय मानस व्यक्त करणारे आहे हे निश्चित!
 मागे सांगितल्याप्रमाणे 'गद्दार'चे घटित या मातीचे नाही. परंतु हुकूमशाहीचे आपण विरोधक आहोत. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हे हुकूमशाहीचेच अंग असते. आणि दहशतवादाचे धक्के हा देश सहन करीत आला आहे. हुकूमशाही
६६ अन्वयार्थ