पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पराभवाची तसेच संघर्षाची; जिद्दीनं पुन्हा सावरण्याची आणि प्रसंगी कोसळण्याची असते. ती घडते, तिला अनेक पदर असतात-अनुस्यूत जाणिवा असतात. पुरुषप्रधानतेमुळे स्त्रीला दुय्यम लेखलं जातं व तिचं मांसल शरीर हेच महत्त्वाचं, ते कष्टानं सुकलं तर बाजार जवळ करणं या पुरुषसत्तेच्या वास्तवाला जेव्हा दुष्काळाची जोड मिळते व स्त्रीला घराबाहेर पडावं लागतं तेव्हा 'बांधा' ही कथा साकारते. त्यातला पुरुषप्रधान वर्चस्वाचा पदर वगळा, ती कथाच संभव होणार नाही. इथं नेम व दगड एकाच लक्ष्यावरचा आहे असं मी ठामपणे म्हणेन. 'कंडम' कथेत पाण्यावरून जातीच्या जाणीवा प्रखरतेनं पढे येतात. एक दलित स्त्री विहिरीत पडून मरते व पाणी विटाळतं, यामध्ये जातजाणीव ही केंद्रस्थानी आहे. मी तर समीक्षकांना एक नवा दृष्टिकोन या पुस्तकाच्या निमित्तानं असा देतो की, पाण्याला जात असते असं मी दाखवलंय. हो- पाण्याला जात असते. ब्राह्मण कुटुंब पाणी टंचाईचा कसा सामना करते हे परिकथा सदृश्य 'खडकात पाणी' मध्ये आलं आहे, तर दलितांना बहिष्कृत करताना त्यांचं पाणी पण तोडलं जातं आणि त्यांचा जीवन उद्वस्थ कसं होतं हे 'उदक'मध्ये मुखर झालं आहे. मराठ व बहुजन समाजासाठा पाणी टंचाईचा प्रश्न हा जातीच्या जाणीवेनं कसं विपरीत वळण घेते हे 'कंडम' व 'मृगजळ'मध्ये आलं आहे. किंबहुना, बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात या चार कथांचं मिश्रण करून 'पाण्याच्या चार जाती' असं एक नाटक लिहावं असं घोळत आहे. पाहू या ते कसं जमतं ते! असो. पण या अनुषंगाने तुम्ही समीक्षकांनी जरा 'ऑऊट ऑफ बॉक्स' विचार करावा असं मी सुचवलं तर तो माझा अगोचरपणा समजू नये, ही नम्र आशा. मी इतर कथेचा संदर्भ देत विवेचन विस्तारानं जरूर करू शकेन, पण तो विस्तारभयास्तव न करता एवढंच म्हणेन की, एक लेखक म्हणून मला लेखनाबद्दल, समीक्षेबद्दल जेवढं कळतं त्यावरून मी असं ठामपणे म्हणू शकतो की, माझा नेम व दगड अचूक लक्ष्यावरच लागलेला आहे.
प्रा. रूपाली शिंदे :
 थेट जगण्या-मरण्याचा प्रश्न आला की माणूस असाहाय्य होतो- अमानुष होतो, अगतिकतेचा गैरफायदा घेतो, याचं रोकडं चित्रण तुम्ही मांडलं आहे. ते अनेकदा अतिरंजित होतं- वेगवान घटनाक्रम आणि दाहक वास्तव यांची सांगड घालताना कलात्मक विश्वासार्हता निर्माण करण्याची आपणास गरज होती असं वाटत नाही का? याबाबत तुमचे मत काय आहे ते सांगावे.
लक्ष्मीकांत देशमुख :

 बरं झाले हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला ते. कारण माझी याबाबत काही विशिष्ट

अन्वयार्थ □ ३२१