पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नुसतेच प्रकारांतरण नसून ते एक श्रेष्ठतर रूपांतरणही झाले आहे. ज्या कवितांत कथेचा अंश नाही, त्या कवितांतून लघुपट तयार करण्यासाठी अभिजात अशी कलादृष्टी असावी लागते. निर्मिती अनेक पदरातून, प्रकारातून आपले आविष्कृत रूप घेते. 'राधा' लघुपटातून कविवर्य पुरु शिव रेगे त्यांच्या मृत्यूनंतर वाहिलेली श्रद्धांजली होय. एखाद्या लेखकाला जागतिक स्तरावरही अशा पद्धतीने श्रद्धांजली वाहिलेली नसेल; असेलच तर क्वचितच. मराठीत तर अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रयोग आहे.
 राधेचे भावविव्हल रूप आदिबंधाच्या प्रतिमेतून प्रकट केले आहे. कृष्ण विषयरूप तर राधा आश्रयरूप आहे हे 'त्रिधा राधा' या कवितेमधून अप्रतिम दाखविले आहे. राधेच्या तीन रूपांचे अवस्थांतरण केले आहे. फुगडी, पार्श्वसंगीत, प्रकाश, ढगाळ झाकोळ, वाडा, राजस्थानी शैलीतील चित्रे, पडदा, रंगीबेरंगी परंपरागत वेषभूषा एवढ्याच साधनावर एक लघुपट तयार करणे कठीण. राधेचा उत्सुक शिणगार, तिची अधीरता, भावविभोरपणा दाखवून पडद्यावर दृश्यमालिका दाखविणे अवघड गोष्ट सोपी केली आहे. नुसते याच कथेत हा लघुपट येत नाही तर 'हे खेळ मनाचे सारे' ही उत्तम कथाच आहेच. सौंदर्याचा ध्यास आणि आस्वाद नाही, तर सौंदर्याची सहजाणिवेच्या रसिकांना लक्ष्मीकांत देशमुखांनी साक्षात प्रतीती दिलेली आहे. सौंदर्याचा आविष्कार स्व-जाणिवेतून प्रकट करणे तसे सुलभ आहे. परंतु प्रकट झालेल्या एका उत्कट भावनेमधून पुन्हा नवनिर्मिती - ही खचित दुष्कर. ते येथे साकार झाले आहे.

॥५॥


 'पाणी! पाणी' हा जगण्यासाठीचा आक्रोश करत फिरणाऱ्या खेळाडूंच्या माणसातील अलौकिक 'नंबर वन' शोधता शोधता 'सावित्रीच्या गर्भात लेकी मारल्या' जात असल्याची जाणीव जगण्यात भयानक पोकळी निर्माण करते. समकालीन मेलोमॅटिक ग्रामीण कथांपेक्षा 'पाणी! पाणी!' चा दर्जा कितीतरी वरचा आहे. देशमुखांच्या कथा या भयातून सुटलेल्या आहेत. त्यांच्या 'पाणी! पाणी!' करत फिरणाऱ्या 'नंबर वन! च्या 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' पर्यंत कथा भावविभोर, भावगंतवळीच्या आणि उत्कृट झाल्या आहेत. त्यांच्या या कथा समकालीन मेलोड्रॅमॅटिक ग्रामीण कथांपेक्षा कितीतरी वरच्या दर्जाच्या आहेत.

 थीमचे अंत:करण बाळगणाऱ्या कथांचा बाह्यवेष सृजनरंगाचा आहे. कथेला मिळणारी कलाटणी, वळण नि घेतलेले वळसे अत्यंत कलापूर्ण सौष्ठवाचे आहेत. अशा स्वरूपाच्या कथेत तर्क असतो. हा तर्क कठोर न करता, तर्कदष्ट न करता कथेच्या आशयात कणव आणि कळवळा उत्पन्न निर्माण केला आहे. भावनिक ओढ - नात्याची किंवा मग घेतलेल्या वश्याची असेल - व तीमध्ये जिवट ओलावा हा या

अन्वयार्थ ३३