शिकलो आहे. तुझ्यासारखं वा जनाब करमालसारखं बुद्धी व विचाराने नव्हे! त्यामुळे मी कधीच परंपरा व रूढीला मानलं नाही. पण अवामच्या दिलोदिमागावर त्याचा केवढा गहरा असर असतो व बदलाला ते किती अनुत्सुक असतात, हे मात्र मी ध्यानात घेतलंच नाही. आणि मुख्य म्हणजे सामाजिक सुधारणा, बदल यासाठी टप्पाटप्यानं होणाऱ्या दशकांच्या, नव्हे शतकांच्या उत्क्रांतीवर माझा विश्वास नाही. मला तेवढा वेळ नाही... मेरे जीते जी मैं वो सारा इन्किलाब और बदलाव देखना चाहता हूँ।"
पण ही सौरक्रांती म्हणजे एक मिथ आहे का अशी शंका तराकी बोलून दाखवतो. कारण या सौरक्रांतीनंतर लगेचच सामान्य नागरिकांनाही, तसेच प्रशासनातील सामान्य सेवक, लष्करातील नोकरांनाही या सौर क्रांतीच्या दमनचक्राचा त्रास होऊ लागला तेव्हा सौरक्रांती ही अवामसाठी आहे, की मूठभर मार्क्सवाद्यांसाठी आहे, असा सवाल निर्माण झाला. या दमनचक्राचा रोख मुल्ला मौलवीविरुद्ध होता. पण ते अवामचे धर्मगुरू असल्याने जनतेची नाराजी वाढू लागली. हीच गोष्ट दुसऱ्या सौरक्रांतीचीसुद्धा सांगता येईल. त्यामुळे अतिरेकी विचारसरणीच्या राजकीय गटांना बळ मिळू लागले. आणि त्यातून नरसंहार सुरू झाला. अवामवर कडक इस्लामी कायद्याचा वरवंटा फिरू लागला. मुजाहिदीन किंवा तालिबानी विचारसरणीचे अंमली पदार्थाच्या तस्करीच्या द्वारे सत्तेत येऊ लागले. इस्लामला मंजूर नसलेल्या अनेक घटना घडू लागल्या. असे जेव्हा होत असते त्याचा सर्वात जास्त फटका स्त्रीला बसतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणून रशियन शिक्षक लायकाचं सांगता येईल. लायका ही अफगाणिस्तानमध्ये कृषिसाक्षरता वर्गासाठी आलेली होती. ती स्त्रियांना शिकवते हे तिथल्या पुरुषांना आवडत नाही. आणि एका दिवशी ते तिच्यावर बलात्कार करून तिच्या नवऱ्यासह मारून टाकतात. शेवटी जमिलालाही जमान दगडांनी ठेचून मारतात. यातूनही हेच दिसून येते. यातून धर्मभावनेशी लढाई करणे किती अवघड आहे याचा प्रत्यय येतो.
परकी सत्ता उलटून टाकण्यासाठी जिहाद पुकारला जातो. सौर क्रांतीने सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट राजवटीला उलथवून टाकण्यासाठी प्रा. करीमुल्ला आसुसलेले होते. प्रा करीमुल्लांना आर्मी कोअर ग्रुपशी समोरासमोर झालेल्या चकमकीचं वर्णन करताना अब्बास म्हणतो, “मामला मोठा कठीण होता. पण उमरची दिलेरी, जिगर आणि सैन्यातलं प्रशिक्षण कामी आलं! विषम संख्येचा