पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लष्करी क्रांती होऊ शकते, पण तिची विचारधारा मात्र मार्क्सवादी असेल.' (पृ. ९२)

 मार्क्सवाद हा समता मानणारा विचारव्यूह आहे. पण तो अमलात आणणारे लोक कसे आहेत यावर त्याचे स्वरूप अवलंबून राहणार हे उघड आहे. पीडीपीए पक्ष फुटतो. त्यातून करमाल व अनाहिता वेगळे होतात. आणि तराकी व अमीन एका बाजूला. इलियास या फुटीची कारणमीमांसा अन्वरला सांगतो, त्यातनू उच्च-नीचतेचा विचार साम्यवादी विद्वानांमध्येसुद्धा कसा असतो याचे प्रत्यंतर येते. करमाल हा सरदार घराण्यातला तर तराकी अन् अमीन हे अफगाणिस्तानच्या समाजरचनेत हलक्या वंशाचे समजले जातात. त्यामुळे ही फूट अटळ होती.

अफगाणिस्तानातील राजकीय स्थित्यंतरे.


 ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानात सतत सत्तांतरे होत होती. कधी हिंसक मार्गाने तर कधी रक्तहीन राज्यक्रांतीने. या सत्तातरांना कुदेते असे म्हटले जाते. प्रथम अफगाणिस्तानच्या बादशहाला तो रोमला उपचारासाठी गेला असता १७ जुलै १९७३ रक्तहीन राज्यक्रांती होऊन जनरल दाऊदखान हा सत्तेबर आला; तर एप्रिल ७९ मध्ये दाऊदखानला हटवून नूर महमद तराकीची कम्युनिष्ट राजवट आली - या घटनेला सौरक्रांती असं संबोधण्यात आलं. १६ सप्टेंबर १९७९ रोजी हाफिजुल्ला अमीन यांनी नूर महंमद तराकीला ठार करून सत्ता मिळविली आणि अमीनला विषप्रयोग करून डिसेंबर ७९ मध्ये बबराक करमालने सोव्हिए युनियनच्या मदतीने काबूलवर ताबा मिळविला. आणि नजीबने १९८६ मध्ये त्याची सत्ता संपवली व आपण अध्यक्षपादाची सूत्रे घेतली. ही सर्व साम्यवादी विचारसरणीची सरकारे होत. आणि नजीबची शेवटची साम्यवादी सत्ता संपवून १९९३ च्या सुमारास मुजाहीदन टोळ्यांची राजवट आली. शेवटी तालिबानी समर्थकांनी शेवटचा कम्युनिस्ट प्रसिडेंट नजीबला अत्यंत निघृणपणे ठार केले.

सौरक्रांती :


 एप्रिल १९७९ मध्ये नूरमहंद तराकीचे सरकार आले याला पहिली सौरक्रांती म्हटले जाते तर डिसेंबर ७९ मधील बबराक करमालच्या सरकार स्थापनेला दुसरी सौरक्रांती म्हटले जाते.

 या सौरक्रांतीबद्दल नूरमहंमद तराकी आणि अन्वर यांच्यामध्ये जी चर्चा होते तिचा आशय असा. तराकी म्हणतो, “अन्वर, मी प्रत्यक्ष जगण्यातून मार्क्सवाद

अन्वयार्थ □ २३१