पान:अंगारमळा (Angarmala).pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वारकरीची जन्मकथा


 शेतकरी संघटना हे नांव आणि कल्पना आम्ही बरेच दिवस मनांत बाळगत होतो आणि त्याविषयी बोलत होतो. आम्ही म्हणजे बाबूलाल परदेशी, शंकरराव वाघ, बाबासाहेब मांडेकर अशी चाकणच्या परिसरातील पाच-सहा माणसं. १९७८ मध्ये कांद्याचे भाव पहिल्यांदा पडले तेव्हापासून ते १९८० पर्यंत चाकणच्या बाज़ारावर कांद्याच्या प्रत्येक हंगामात घारीच्या नजरेने देखरेख ठेवायची. १९८० मध्ये कांद्याचे पिक तर मोठं आलं आणि यंदा पुन्हा निर्यातीला परवानगी नसल्याने भाव घसरणार हे स्पष्ट झाले. तेव्हा संघटनेला काहीतरी मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करू लागलो. चाकण गावाच्या मध्यभागी एका खोलीवर पाटी लावली आणि त्या जागी बाजाराच्या दिवशी कार्यकर्त्यांनी तासभर तरी येऊन जावे, अशी जाहीरात केली. माझ्या आठवणीप्रमाणे पहिली बैठक झाली २७ ऑक्टोबर १९७९ रोजी. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्या दिवशी झालेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तातडीने साप्ताहिक चालू करायचे. साप्ताहिकाचे बाळंतपण काही लहान नाही. त्याचं नाव आधी ठरवावं लागतं, ते नाव दिल्लीहून मंजूर करावून आणावं लागतं, लेख, छपाई, पैशांची व्यवस्था, अनेक सव्यापसव्य उरकावी लागतात. अनियतकालीक काढले तर पुष्कळ अडचणी दूर होतात. अनियतकालीक म्हणजे ज्याचा निघण्याचा काही निश्चित कार्यक्रम नाही असे पत्रक. कधी दोन दिवसांनी तर कधी महिनाभरही निघणार नाही. त्याचं नाव काहीही असू शकतं. वर्गणीदार वगैरेची कटकट नाही. आवश्यकतेप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे जेव्हा जमेल तेव्हा पत्रकाची प्रसिद्धी करायची, आज मागे वळून पाहिले म्हणजे असे वाटते की त्यावेळी अनितकालीक काढले असते तर जास्त योग्य झाले असते. निदान जास्त पेलवले असते; पण शेतकरी संघटनेच्या ताकदीविषयी व भविष्याविषयी जमलेल्या सर्वांच्याच मनात जबरदस्त आत्मविश्वास होता. अनियतकालिक काढणे म्हणजे पोरकटपणा वाटला. त्याऐवजी छोटे का होईना नियमित चालणारे साप्ताहिक काढावे. हे संघटनेच्या प्रतिष्ठेला व स्वरूपाला जास्त साजेसे वाटले. बाजारच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जमायचे. हेच त्यावेळच्या संघटनेचे मूळ स्वरूप. त्याच दिवशी जमणाऱ्या प्रत्येकाला साप्ताहिक देता आले तर सामुदायिक वाचन व चर्चा होऊ शकेल अशीही कल्पना. गावोगांव अंक गेला पाहिजे म्हणजे

अंगारमळा \ १८७