पान:अंगारमळा (Angarmala).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खर्च येत नाही. कोणीही गंगेत लोटून दिलं, की गंगामाई वाहून नेते. सिंदबादच्या कहाण्यात एक वर्णन आहे- एका बेटावर हत्तींची अशी एक दरी असते. म्हातारे झालेले हत्ती तिथे जातात आणि मरतात. काशी हे हिंदू लोकांचे, विशेषत: शेतकऱ्यांचे धर्मभावनेने से ठेवण्याचं स्थान नाही; तर आपल्या पोराला आपला भार सोसत नाही म्हणून आईबापांनी करावयाच्या आत्मत्यागाची जागा आहे. हे विश्लेषण मी अनेक लोकांशी बोलून, चर्चा करून केले आहे. हे विश्लेषण मला साहित्यात कुठे सापडत नाही. माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला या गोष्टी समजतात, 'ग्रामीण' म्हणवणारे, सर्व गावाचं दुःख घालवण्याऐवजी गावागावामधले वाद; हे झोपडं, ती वस्ती, तो वाडा यांच्याच वर्तुळात गिरक्या घेत का बसतात? गावामध्ये वाडा आहे, वाडी आहे, वस्ती आहे आणि गावाचं रूप वाडा हेही खरं आहे, वस्ती हेही खरं आहे आणि वाडी हेही खरं आहे. या सगळ्यांच्या छटा ग्रामीण साहित्यात आल्या आहेत. आपण ग.ल. ठोकळांच्या कवितेची चेष्टा करतो. त्यांच्यासारखे इतरही अनेक कवी आहेत. गावावर जेव्हा ब्राह्मण, सावकार, जमीनदार, शिक्षक यांचा पगडा होता त्या वेळी जी काव्यरचना झाली, त्याचं प्रातिनिधिक स्वरूप 'ग.ल.ठोकळ' आहेत. 'अजुनि कसे येती ना परधन्या राजा' यांसारख्या ब्राह्मणी तोंडवळ्याची; पाण जानपद भाषेतील कविता त्या काळात तयार झाली. हा त्या ग्रामीण आविष्काराचा एक भाग आहे. त्यानंतर पाटील, माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी आली, ती कोणाचों प्रतिनिधित्व करतात? वाड्यांमधून सहकारी चळवळीत किंवा त्या संबंधात जी माणसं गेली आणि मोठी झाली त्यांचा गाव सांगणारे साहित्य ते तयार करतात. तेही गावच आहे; पण ते गावाचं एक वेगळं रूप दाखवतं. ग्रामीण साहित्य चळवळ म्हणून जी म्हटली जाते तिने मोठं काम केलं आहे. त्यातल्या प्रत्येकानं आपल्याआपल्या अनुभवातलं गाव चितारलं; ते अत्यंत प्रामाणिक चित्रण आहे; पण ते हत्तीचा पाय किंवा शेपूट सांगणारं आहे. याच्या पलीकडे वाडा, वाडी आणि वस्ती यांचं एकक सांगणारं ग्रामीण साहित्य का तयार होत नाही. मी असं म्हणत नाही, की गावातला सावकार अन्याय करतो तरी त्याच्याविरुद्ध बोलू नका. कोणी कोणाला अडचणीत आणीत असेल तर ते सांगितलं पाहिजे. पण, तेच तेच सांगायचं, गावातली झोपडी आणि विटांचं घर यांच्यातला संघर्ष वारंवार सांगायचा आणि गावातल्या झोपडी आणि विटांच्या घरातील दरिद्री, जीवनामागे मुंबईच्या चोवीस मजली इमारती आहेत, त्याच्याबद्दलमात्र एक अक्षर काढायचं नाही. असं दिसत नसेल तर 'जे न देखे रवि ते देखे कवी' ऐवजी सोयीसोयीने पाहणारा हा कवी आहे असा प्रकार होईल. आजकालचं शेतकरी साहित्य किंवा ग्रामीण

अंगारमळा । १२२