चतुःश्लोकी भागवत/हरिगुणसंकीर्तन

विकिस्रोत कडून

ऐसें ऐकतां हरिगुण । रमा झाली स्वानंदें पूर्ण । तेही संतोषोनी आपण । अगाध त्याचे गुण गाऊं लागली ॥८॥
ऐकतां हरिनामगुणकीर्ति । ज्यासी उल्हास नुपजे चित्ती । तो परम अभाग्य त्रिजगतीं । जाण परीक्षिती निश्चित तूं ॥९॥
मी हरीचें निजअर्धांग । ह्नणें परी नदेखें अंगसंग । सांग नाहीं ह्नणती श्रीरंग ॥ व्यापुनी सर्वांगे वर्तवीमते ॥१०॥
माझें लावण्यसमर्थपण गुण । रमा आणि रमारमण । अवघे श्रीहरिनारायण । माझें व्रतें मीपण तयाचेनी ॥११॥
त्यातें मी मानीं आपुला कांत । तंव मीपण नुरे त्याआंत । मज सबाह्य श्रीभगवंत । असे वर्तत निजानंदें तो ॥१२॥
आतां त्याची कीर्ति गावी कैसी । तंव वाच्य वाचक हषीकेशी । यास्थिती करितां कीर्तनासी । कीर्तिवंतासी निजलाभ होय ॥१३॥
देवा तूं सर्वभूतनिवासी । ह्नणतां भूतमात्रा नातळासी । भूतें भूतात्मा तूंच होसी । नमो हषीकेशी परमात्मया ॥१४॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.