चतुःश्लोकी भागवत/ज्ञानप्राप्ति

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

न करितां भगवदभक्ती । ब्रह्मयासी नव्हे ज्ञानप्राप्ती । तेथें इतरांची कोण गती । अभजनी प्राप्ती पावावया पैं ॥५२॥
जीवाचे निरसावया अज्ञान । मुख्यत्वें असे भगवदभजन । स्वयें करिताहे चतुरानन । तेंचि निरुपण शुक सांगे ॥५३॥
केवळ चैतन्य विग्रहो । सत्यसंकल्प भगवद्देहो । त्याचे दर्शनार्थ पहाहो । तपादि उपावो हरी प्रेरी ॥५४॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.