चतुःश्लोकी भागवत/चित्तशुद्धी

विकिस्रोत कडून

त्यासी द्यावी आपुली भेटी । कृपा उपजली हरीचे पोटी । नव्हती चित्तशुद्धि गोमटी । ह्नणुनी हरिरुपी दृष्टी रिघेना ॥७९॥
जरी ह्नणाल बहुत दूरी । इंद्रियां तो व्यापारी । निजज्ञानें नांदे श्रीहरी । घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥
इंद्रियव्यापार ज्ञानेंहोती । तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं । या लागीं हदयस्थाची प्राप्ती । प्राणी न पावती विषयाध जे ॥८१॥
ते विषयासक्ती ज्याचीउडे । त्या नांव चित्तशुद्धि जोडे । तें हदयी हरि आतुडे । सर्व सांपडे परमात्मा मग ॥८२॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.