चतुःश्लोकी भागवत/चार श्लोक

विकिस्रोत कडून

साचचि ब्रह्मा जन्मला पोटीं । यालागीं हरीसी कळवळ मोठो । पूर्णब्रह्म चौश्लोकांसाठीं । त्यासि उठाउठी वोपिता जाला ॥६॥
न माखतां शद्वाचें वदन । नायकतां श्रोत्राचे कान । न देखतां वृत्तीचे नयन । चौश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥७॥
आतळों न देतां गगन । नलगतां सूर्यकिरण । प्राणस्पर्श न होतां जाण । चतुः श्लोकी चतुरानन सुखी केला ॥८॥
दूरीं दुरावोनि अज्ञान । जागें न होतां शहाणपण । मौनेचि जिवें जीव मारुन । चौश्लोकी चतुरानन सुखी केला ॥९॥
इशिया युक्ती नारायण । निजपुत्रालागी आपण । थोडे निरुपणॆं जाण । ब्रह्मपरिपूर्ण केला देवे ॥७१०॥

यथा महांति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु ।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥५॥
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात्सर्वत्र सर्वदा ॥६॥
एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ।
भवान्कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॥७॥

येथें नघडे हें निरुपण । शिष्य जालिया ब्रह्मसंपन्न । पुत्रस्नेह बापुडे कोण । त्यासि सदगुरु संपूर्ण पूज्यत्वें मानी ॥११॥
ब्रह्मसंपन्नतेपुढें । पुत्रसुख कायसें बापुडें । हे गुरुकृपा जयासी घडे । त्यासि करी रोकडें ब्रह्मपूर्ण ॥१२॥
जें बोला बुद्धी नातुडे । जें वृत्तीच्या हाता नचढे । तें द्यावया निजनिवाडें । खेवाचें धडफुडें मिस केलें ॥१३॥
हदया हदय एक झालें । ये हदयीचें ते हदयीं घातलें । यापरी न बोलतां बोलें । पूर्णत्व दिधलें प्रजापतीसी ॥१४॥
जेवीं दोन्ही दीप एक होती । प्रबळ चिच्छक्ती कोंदाटे ॥१५॥
ब्रह्मयाचें धन । ब्रह्मा परिपूर्ण ब्रह्म जाला ॥१६॥
तेथें बोध ना अबोध । स्वानंद ना निरानंद । गुरुशिष्य जाले एकवद । पूर्ण परमानंद सदोदित ॥१७॥
गुरुशिष्य जाले अभिन्न । खुंटला बोल पडिलें मौन । निः शेष विरालें मी तूंपण । अद्वय अलिंगन ऐसें पडिलें ॥१८॥
स्वरुपाचें नवलपण । अंगीं मुरालें ब्रह्मस्फुरण । निः शेष झालें विस्मरण । अव्ययज्ञान पावला विधाता ॥१९॥
यापरी श्रीनारायण । आपुलें देऊंनि पूर्णपण । पुढें करावया सृष्टिस्रजन । अकर्तात्मबोधें पूर्ण प्रबोधिला विरिंची ॥७२०॥
मुख्य बिंबी न होतां भिन्न । सूर्यापुढें प्रकाशती किरण । तेवीं नदेखोनि वेगळेपण । सुटलें अलिंगन हरिब्रह्मयांचें ॥२१॥
जळीं जळावरी वसती कल्लोळ । कल्लोळी असें सबाह्य जळ । तैसा अलिंगन मेळ । जाला वेगळ हरिब्रह्मयांचा ॥२२॥
जेवीं दीपें दीप लाविला । तेथें नकळे वडील धाकुला । तेवीं चिद्रूपें समत्वा आला । हरिरुप जाला प्रजापती ॥२३॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.