Jump to content

चतुःश्लोकी भागवत/गुरुमहिमा

विकिस्रोत कडून

त्याचे चरणींची माती । अवचटें लागल्या स्वचित्तीं । जन्ममरणा होय शांती । चारी मुक्ती वोळगण्या ॥१०॥
तो जिकडे पाहात जाय । ते दिशा सुखरुप होय । त्याचे जेथें लागती पाय । तेथें धांवे लवलाहें परमानंदू ॥११॥
यालागी त्याचे वंदितां चरण । जीवासी वोडवे शिवपण । चरणस्पर्शे स्वानंद पूर्ण । अगाध महिमान गुरुचरणीं ॥१२॥
त्याची सदभावें जें घडे सेवा । ते जीवत्व शोधितां नमिळे जीवा । तंव शिवही मुकला शिवभावा । हा अभिनव ठेवा सेवेमाजीं ॥१३॥
तो ज्यासीं आश्वासी आपण । त्यासी हरिहर वंदिती पूर्ण । कळिकाळ घाली लोटांगण । रिघती शरण कामक्रोध ॥१४॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.