चतुःश्लोकी भागवत/आत्मनिवेदन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

नुरवूनि मीतूंपणाची वार्ता । वदविताहे ग्रंथकथा । तेथें मी कविकर्ता । हे कोणें अहंता धरावी ॥२१॥
मज नाहीं ग्रंथ अहंता । ह्नणोनि श्रोत्यांचें विनविता । ते विनवणीच तत्त्वतां । अंगीं अहंता आणूं पाहे ॥२२॥
तंव माझें जें कां मीपण । तें सदगुरु झाला आपण । तरी करितांही विनवण । माझें मीपण मज नलगे ॥२३॥
माझी क्रिया कर्म कर्तव्यता । सदगुरुचि झाला तत्त्वतां । आतां माझ्या मीपणाची अहंता । मजसी सर्वथा संबंध नाहीं ॥२४॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.